---Advertisement---

IND vs ENG: भारताने ओव्हलमध्ये कधी जिंकला होता शेवटचा कसोटी सामना? ‘हिटमॅन’ने घातला होता धुमाकूळ

On: मंगळवार, जुलै 29, 2025 10:51 PM
---Advertisement---

India vs England Oval Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाईल. भारताने या मैदानावर शेवटचा सामना जून 2023 मध्ये खेळला होता, जो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपचा अंतिम सामना होता. या सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघासाठी शेवटचा विजय 2021 मध्ये आला होता. त्या सामन्यात भारताने इंग्लंडला 157 धावांनी हरवले होते. (India vs England Oval Test)

2021 मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. (Virat Kohli captaincy Oval) विराट त्या सामन्यात बॅटने फार काही खास करू शकला नव्हता. पहिल्या डावात विराटने 50 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात तो 44 धावा करून बाद झाला होता.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. भारतीय संघ 191 धावांवर ऑलआउट झाला होता. त्या डावात भारतासाठी विराट कोहलीने अर्धशतक झळकावले होते, तर शार्दुल ठाकूरने 36 चेंडूत 57 धावांची तुफानी खेळी केली होती. या दोघांशिवाय कोणताही भारतीय फलंदाज त्या डावात मोठी धावसंख्या करू शकला नाही.

प्रत्युत्तरादाखल, इंग्लंड संघाने पहिल्या डावात 290 धावा केल्या. इंग्लिश संघाने पहिल्या डावाच्या आधारावर 99 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून ओली पोपने 81 आणि ख्रिस वोक्सने 50 धावांचे योगदान दिले होते.

त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा भारतीय संघ फलंदाजीला आला, तेव्हा रोहित शर्माने बॅटने धुमाकूळ घातला आणि शानदार शतकी खेळी केली. रोहितने 256 चेंडूत 127 धावा केल्या. (Rohit Sharma Oval century) रोहितशिवाय चेतेश्वर पुजारा (61), रिषभ पंत (50), शार्दुल ठाकूर (60) यांनी अर्धशतकी खेळी केल्या होत्या. या सर्व फलंदाजांमुळे भारतीय संघाने 466 धावा केल्या. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 367 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 210 धावा करू शकला आणि त्यांना 157 धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी रोरी बर्न्सने 50 आणि हसीब हमीदने 63 धावा केल्या. या दोघांशिवाय कोणताही फलंदाज संघासाठी मोठी खेळी करू शकला नाही. रोहित शर्माला त्याच्या शानदार शतकासाठी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आता येणाऱ्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---