भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील दुसरा डाव भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. आता न्यूझीलंड संघाला शेवटच्या दिवशी(२९ नोव्हेंबर) विजयासाठी २८० धावा करायच्या आहेत. तसेच ९ गडी शिल्लक आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी या सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
वसीम जाफर यांनी ईएसपीएनक्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “शेवटच्या दिवशी २७५ धावा करणे कठीण असते. भारतीय संघाला ही गोष्ट माहीत होती वाटतं, त्यामुळे त्यांनी डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. जर न्यूझीलंड संघाने धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तर ही भारतीय संघासाठी चांगली गोष्ट असेल कारण फलंदाज बाद होण्याची शक्यता वाढेल. भारतीय संघाला माहीत आहे, न्यूझीलंड संघ सामना ड्रॉ करण्याच्या हिशोबाने खेळणार. आता फलंदाजाच्या जवळपास ३ ते ४ क्षेत्ररक्षक असतील, त्यामुळे त्यांच्यासाठी सामना जिंकणे कठीण असणार आहे.”
या सामन्याच्या चौथ्या दिवशी (२८ नोव्हेंबर) भारतीय संघाचे ५ फलंदाज ५१ धावांवर माघारी परतले होते. परंतु श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा अडचणीत असलेल्या भारतीय संघाला बाहेर काढले. तसेच वृद्धिमान साहाने देखील नाबाद अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाला २३४ धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच भारतीय संघाने या सामन्यात न्यूझीलंड संघासमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम
भारतीय संघाचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो पदार्पणाच्या सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावणारा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तो शिखर धवन आणि रोहित शर्मा नंतर तिसराच फलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात १७० धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ते दोघे कठीण काळातून जात आहेत, पण…’, रहाणे-पुजाराच्या फॉर्मबद्दल फलंदाजी प्रशिक्षकांचे भाष्य
तू अशी जवळी रहा! विराटने शेअर केला ‘कपल पिक्चर’
लढवय्या साहावर नेटकरी खूश! चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया