संपूर्ण भारत देश आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव म्हणजे ७५ वे वर्ष उत्साहात साजरे करण्यात मग्न आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम सुरू केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारताच्या जवळपास सर्वच क्रिकेटपटूंनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला असून, आपल्या सोशल मीडियाचे प्रोफाइल पिक्चरही भारतीय ध्वजात ठेवले आहेत.
खेळाडूंनी या अभियानात आता सहभाग नोंदवला असला तरी, काही भारतीय क्रिकेटपटू अनेक वर्षांपासून आपल्या हेल्मेटवर भारताचा राष्ट्रध्वज लावताना दिसून यायचे. १९९८ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याची सुरुवात केली होती. आपल्या हेल्मेटवर तिरंगा असल्याने आपल्याला आणखी स्फूर्ती मिळत असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग व सौरव गांगुली यांनी तसेच अनुकरण केले.
पुढे एमएस धोनी, सुरेश रैना हे देखील आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावत. सध्या विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर अशा जवळपास सर्वच क्रिकेटपटूंच्या हेल्मेटवर भारताचा हा राष्ट्रध्वज लावलेला दिसून येतो. मात्र, एकेकाळी अभिमानाने आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावणारा माजी कर्णधार एमएस धोनी याने नंतरच्या काळात आपल्या हेल्मेटवरून भारताचा ध्वज हटवला होता.
भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या धोनीने याविषयीचे कारण देताना म्हटलेले,
“मी केवळ फलंदाजी करत नाही. मला यष्टीरक्षणही करावे लागते. यष्टीरक्षण करताना अनेकदा मी हेल्मेट जमिनीवर ठेवतो. अशावेळी भारताच्या या राष्ट्रीय प्रतिकाचा अवमान होऊ नये म्हणून मी हेल्मेटवरून तिरंगा हटवण्याचा निर्णय घेतला होता.”
२०१९ च्या वनडे विश्वचषकात धोनीने आपल्या किपींग ग्लोव्हजवर भारताच्या टेरिटोरियल आर्मीचा बलिदान बॅच लावलेला त्यामुळे देखील काही वाद निर्माण झाला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला फुटबॉल लीगसाठी अस्पायर एफसी सज्ज
‘या’ चारपैकी एक खेळाडू व्हायला हवा टीम इंडियाचा कर्णधार’! दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाजाचे वक्तव्य