वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ६८ धावांनी मोठा विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांचे प्रदर्शन भारताच्या विजयात महत्वाचे ठरले. भारताने या सामन्यात मोठी धावसंख्या केली. परंतु रोहितच्या मते फलंदाज अधिक चांगले प्रदर्शन करू शकत होते. विजयानंतर त्याने खास प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्माने या सामन्यात ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. तसेच कार्तिकने १९ चेंडूत ४१ धावा केल्या. रोहित जेव्हा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ५ विकेट्सवर १२७ धावा होती. त्यानंततर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने डावा सांभाळला आणि संघाची धावसंख्या १९० पर्यंत पोहोचवली. भारतीय संघाने या सामन्यात मोठी धावसंख्या उभी केली असली, तरी रोहितच्या मते संघातील फलंदाजांनी अधिक वेळ खेळपट्टीवर टिकून राहिले पाहिजे.
पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्हाला माहिती होते की, हे थोडे अवघड असेल. मोठे शॉट खेळणे सुरुवातीला सोपे नव्हते. जे खेळाडू तेव्हा खेळपट्टीवर असतील त्यांनी जास्त वेळ फलंदाजी केली पाहिजेआणि आम्ही ज्या पद्धतीने डावाचा शेवट केला, तो अप्रतिम प्रयत्न होता.”
“जेव्हा आमचे पहिले १० षटके संपवले होते, तेव्हा असा विचार केला नव्हता की, आम्ही १९० धावांपर्यंत पोहचू शकू. खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला आणि शेवटही चांगला राहिला. आम्ही खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न् करत आहोत,” असेही रोहित पुढे बोलताना म्हणाला.
रोहितच्या मते खेळपट्टीवर चेंडूला चांगली ग्रिप मिळत होती आणि याच कारणास्तव भारताने तीन फिरकी गोलंदाजांना खेळवले. फिरकीपटू रविंचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोईने या सामन्यात प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने देखील २ विकेट्स नाववार केल्या. रोहित शर्मा एकटा असा खेळाडू होता, ज्याने या सामन्यात अर्धशतक केले.
भारताने दिलेले १९१ धावांचे लक्ष्य गाठताना वेस्ट इंडीजला १२२ धावांवर समाधान मानावे लागले. मर्यादित २० षटकांमध्ये वेस्ट इंडीजने ८ विकेट्स गमावून या धावा केल्या. वेस्ट इंडीजचा एकही फलंदाज २० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘लवकरच पुनरागमन करणार’, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहिर होताच केएल राहुलने केली भावनिक पोस्ट
‘मी माझ्या मनाचं ऐकलं अन् जे झालं ते…’, अर्शदीप सिंगने सांगितलं पडद्यामागील रहस्य
भारत पाकिस्तान एजबॅस्टन वर भिडणार, आपण मात्र ‘या’ ठिकाणी सामना पाहणार!