भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत. परंतु तत्पूर्वी भारत आणि वेस्ट इंडीज संघांसमोर एक मोठी अडचन निर्णाम झाली आहे. पहिले तीन सामने खेळले गेले असून भारत १-२ अशा आघाडीवर आहे. भारतीय खेळाडूंना अमेरिकेचा विसा वेळेत मिळाला नसल्यामुळे राहिलेल्या दोन सामन्यांविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार अमेरिकेचा विसा न मिळाल्यामुळे मालिकेतील शेवटचे दोन सामने रद्द होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार भारतीय संघ विसाचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुआना शहरात जाईल, ज्याठिकाणी अमेरिकी दुतावास आहे. इथे खेळाडूंची महत्वाची बैठक पार पडेल. टी-२० मालिकेतील चौथा सामना ६ ऑगस्ट रोजी आयोजित केला गेला आहे. अशात क्रिकेट वेस्ट इंडीजला आशा आहे की, ६ तारखेपूर्वी या प्रश्नावर तोडगा निघेल. मात्र, जर असे झाले नाही, तर दोन्ही सामने रद्द करण्याची वेळ येऊ शकते.
दरम्यान, अलिकडच्या काही काळापासून अमेरिकेत क्रिकेटला प्रत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे चाहते जगभर पसरलेले आहेत. अमेरिकेत देखील भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. याच कारणास्तव वेस्ट इंडीविरुद्धचे शेवटचे दोन सामने अमेरिकेत आयोजित केले गेले होते. पण आता या दोन्ही सामन्यांविषयी अनिश्चितता तयार झाली आहे.
खेळाडूंच्या विसाला उशीर झाल्याप्रकरणी क्रिकेट वेस्ट इंडीजनेही प्रतिक्रिया दिली आहे. बोर्डाने सांगितल्याप्रमाणे, गुआनामध्ये बुधवारी (३ ऑगस्ट) सर्व खेळाडूंची अपॉइनमेंट बुक केली गेली आहे. सर्व कागदपत्रे तयार आहेत. आम्हाला पूर्ण आशा आहे की, विसा मिळेल. शेवटी बोलताना त्यांनी असेही सांगितले की, या प्रक्रियेवर आमचे कसलेही नियंत्रन नाही.
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचे शेवटचे दोन सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी आयोजित केले गेले आहेत. संघाला जर विसा मिळाल, तर गुआना शहरातून संघ अमेरिकेतील मियामीसाठी रवाना होईल. दरम्यान, भारतीय संघाला या दौऱ्यात इतरही काही प्रमुख समस्या उद्भवल्या. टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळाडूंचे साहित्य सेंट किट्समध्ये उशीरा पोहोचले होते, ज्यामुळे सामना सुरू होण्यासाठीही उशीर झाला होता. मालिकेतील तिसरा सामना देखील काही कारणास्तव ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा सुरू केला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘सुर्यकुमार यादवने याच क्रमांकावर फलंदाजी करावी’, माजी दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला
पाकिस्तानी क्रिकेटर्स बीबीएलमध्ये खेळण्याचे पाहत होते स्वप्न! पीसीबीने रोखले, वाचा कारण
‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर