मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. या हंगामात केवळ 29 सामने पूर्ण झाले. त्यामुळे उर्वरित 31 सामने कुठे आणि कधी खेळवायचे असा प्रश्न असतानाच सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने एक प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या बीसीसीआयसमोर उर्वरित आयपीएल 2021 हंगामा पूर्ण करण्यासाठी कालावधी शोधण्याचे आव्हान आहे. कारण अगामी काळात प्रत्येत राष्ट्रीय संघांचे वेळापत्रक बऱ्यापैकी निश्चित असून काही प्रमाणात व्यस्त देखील आहे. असे असताना केवळ भारतीय खेळाडूंमध्ये आयपीएल घ्यावी का, अशी चर्चा अधून-मधून ऐकू येत असते.
याबद्दल स्पोर्टकीडाशी बोलताना साहाने सांगितले की “आयपीएलचे आयोजन परदेशी खेळाडूंविना केले तर ही स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारखीच असेल.”
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही भारतातील टी20 प्रकारातील देशांतर्गत स्पर्धा आहे. या स्पर्धेत राज्य क्रिकेट संघ भाग घेत असतात.
साहा आयपीएल 2021 दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह झाला.
आयपीएल 2021 दरम्यान वृद्धिमान साहा हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 4 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रापण पॉझिटिव्ह आढळून आला होता. यानंतर तातडीची बैठक घेऊन आयपीएल 2021 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या साहा आणि मिश्रा दोघेही कोरोना मुक्त झाले असून घरी परतले होते.
तसेच साहा आता भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यासाठी जाण्यासही सज्ज आहे. पुढील महिन्यात भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघासाठी आली आनंदाची बातमी, वाचा सविस्तर
धोनी संघात असल्याने नियमितपणे सामने खेळण्याची संधी मिळत नसे, ‘या’ यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया
अरे व्वा! श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज; व्हिडिओ शेअर करत दिले संकेत