न्यूझीलंड मालिकेपूर्वी डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीपर्यंतचा भारताचा प्रवास जितका सोपा वाटत होता. आता पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये किवी संघाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर तोच प्रवास तितकाच कठीण दिसत आहे. न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताचे 74.24 टक्के गुण होते आणि टीम इंडिया पहिल्या स्थानावर होती. बेंगळुरू आणि पुण्यातील पराभवानंतरही भारत पहिल्या क्रमांकावर असला तरी त्यांची विजयाची टक्केवारी 62.82 टक्के वर आली आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारूंकडे 62.50 टक्के गुण आहेत.
भारत पुढील महिन्यात 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जर टीम इंडियाला डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये नंबर-1 राहून या मालिकेची सुरुवात करायची असेल. तर न्यूझीलंडला मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत टीम इंडियाने कोणत्याही किंमतीत पराभूत करावे लागेल. भारताला आता दुसरा पराभव परवडणारा नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीतही टीम इंडिया हरली. तर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील आपले वर्चस्व गमावू शकते.
पुणे कसोटी गमावल्यानंतर, भारताचे 13 सामन्यांत 98 गुण आहेत. जर टीम इंडिया मुंबईत खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतही हरली तर, विजयाची टक्केवारी 58.33 टक्के होईल. अशा परिस्थितीत, संघ केवळ डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पहिले स्थान गमावणार नाही तर अंतिम फेरी गाठण्याच्या आशांनाही मोठा धक्का बसेल.
जर भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तर दोन्ही संघांमध्ये 4-4 गुण वाटून दिले जातील. या स्थितीत भारताच्या खात्यात 14 सामन्यांत 102 गुण होतील. या स्थितीतही भारत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरेल, कारण सामना अनिर्णित राहिल्यास संघाच्या विजयाची टक्केवारी 60.71 होईल.
हेही वाचा-
“खडतर आव्हान द्यायचे होते…”, किवी कर्णधाराने सांगितले न्यूझीलंडच्या विजयाचे रहस्य
लाजिरवाण्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडवर, वानखेडे कसोटीपूर्वी घेतला हा मोठा निर्णय!
हा खेळाडू होऊ शकतो पाकिस्तानचा नवा कर्णधार, PCB लवकरच घेणार मोठा निर्णय!





