India W vs Australia W Semi-Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक 2025 चा उपांत्य सामना 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने गट फेरीचा सामना तीन विकेट्सने जिंकला. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर एलिसा हिली ऑस्ट्रेलियाची कर्णधार आहे.
भारतीय संघाने महिला विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत, ज्यात एकदा विजय आणि एकदा पराभव झाला आहे. त्यामुळे, यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला एकजुटीने कामगिरी करावी लागेल. भारत 2005 आणि 2017 मध्ये दोनदा महिला विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचला आहे.
1997 च्या महिला विश्वचषकाचा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने एकूण 123 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघ फक्त 104 धावा करू शकला आणि सामना गमावला.
महिला विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ज्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 281 धावा केल्या. ज्यामध्ये हरमनप्रीत कौर संघाची मॅच विनर बॅटर म्हणून उदयास आली. तिने 115 चेंडूत एकूण 171 धावा केल्या, ज्यात 20 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. तिच्यामुळेच भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला.
महिला विश्वचषक 2025 साठी भारतीय संघ: शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड.






