विराट कोहलीवर अनेकदा आरोप केले जातात की तो आता पूर्वीसारखा राहिला नाही. काही दिवसांपूर्वी भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने विराट कोहली बदलला असल्याचे म्हटले होते. पण यश दयालच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर प्रत्यक्षात खूप वेगळे आहे. यशच्या बोलण्यातून विराट तरुण खेळाडूंसाठी किती आश्वासक आहे हे दिसून येते. चला तर मग जाणून घेऊया की किंग कोहलीच्या काही शब्दांनी (मार्गदर्शनाने) यश दयालचे नशीब कसे बदलले.
बांग्लादेश विरुद्ध चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी यशची टीम इंडियात निवड झाली आहे. आयपीएल आणि दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या यशचा पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास यशसाठी अजिबात सोपा नव्हता. आयपीएल 2023 मध्ये रिंकू सिंगकडून सलग 5 षटकार मारल्यानंतर यश पूर्णपणे तुटला होता. त्यावेळी यश दयाल गुजरात टायटन्सचा भाग होता.
पाच षटकार ठोकणाऱ्या यशवर गुजरातने अजिबात विश्वास दाखवला नाही आणि पुढच्याच मोसमात त्याला रिलीज केले. त्यानंतर आरसीबीने यशला विकत घेतले. आरसीबीमध्ये आल्यानंतर विराट कोहलीने यशच्या आयुष्यात प्रवेश केला. ज्याच्या काही शब्दांनी त्याने यशला पूर्णपणे बदलून टाकले.
एका मुलाखतीत बोलताना यश म्हणाला, विराट कोहलीने मला 2.O बनवले. एकदा मी ग्राउंडवर सराव करत होतो. तेव्हा भाई (विराट कोहली) माझ्याजवळ आला. तो म्हणाला की मला तुझ्याकडे काही काम आहे. 5 मिनिटांसाठी माझ्या खोलीत ये. तेव्हा मी गेलो. मला बसवले. तो म्हणाला, रिंकूसोबत जे काही झालं ते त्याचा भाग होता. पण ते तू विसरुन जा. आम्ही संपूर्ण सीझनसाठी तुझी पाठराखण करू म्हणूनच आम्ही तुला निवडले आहे.” जेव्हा मी त्याच्या खोलीतून परत आलो तेव्हा मी 2.O होतो.
हेही वाचा-
आयपीएल विजेत्या कर्णधारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? हिटमॅनशी खास नाते
भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी समालोचकांची यादी जाहीर; अनेक दिग्गजांचा समावेश
गोल्डन बॉय नीरज चोप्राची शस्त्रक्रिया यशस्वी; फ्रॅक्चर हाताने खेळली होती डायमंड लीग