---Advertisement---

गोव्याचा कर्णधार होणार होता, पण अचानक असं काही घडलं की यशस्वी पुन्हा मुंबईकडे वळला!

On: मंगळवार, जुलै 1, 2025 7:54 AM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आगामी हंगामात पुन्हा मुंबईकडूनच खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) सोमवारी त्याच्या एनओसी मागे घेण्याच्या विनंतीला मंजुरी दिली. एप्रिल महिन्यात जयस्वालने गोवा संघाकडून खेळण्यासाठी NOC (ना हरकत प्रमाणपत्र) मागितले होते आणि तो गोव्याचा कर्णधार होण्याची शक्यता होती. मात्र, मे महिन्यात त्याने एमसीएला पत्र लिहून ही विनंती मागे घेतली.

एमसीएच्या अ‍ॅपेक्स कौन्सिलने याला मंजुरी दिली असून जयस्वाल आता पुन्हा मुंबई संघासाठी खेळणार आहे. “यशस्वी हा मुंबई क्रिकेटचा अभिमान आहे. त्याची एनओसी मागे घेण्याची विनंती आम्ही स्वीकारली आहे,” असे एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

मे महिन्यात लिहिलेल्या पत्रात जयस्वालने नमूद केले होते, “माझे काही कौटुंबिक कारणास्तव गोव्यात स्थलांतराचे नियोजन होते, पण सध्या ते रद्द झाले आहे. त्यामुळे मी एमसीएकडे विनंती करतो की, मला मुंबईकडूनच खेळण्याची परवानगी द्यावी. मी एनओसी ना बीसीसीआय ना गोवा क्रिकेट असोसिएशनकडे सादर केलेली नाही.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईचा आणखी एक खेळाडू पृथ्वी शॉ याने इतर राज्यात जाण्यासाठी एमसीएकडे एनओसी मागितले होते आणि त्याची विनंती मान्य करण्यात आली.

यासोबतच एमसीएने जाहीर केले की, मुंबईतील प्रसिद्ध डॉ. एच. डी. कांगा लीग स्पर्धा 20 जुलैपासून पार पडणार आहे.
“Kanga League ही स्पर्धा नाही तर मुंबई क्रिकेटची परंपरा आहे. यावर्षी मूळ स्वरूपात ती पुन्हा आयोजित केली जाणार आहे,” असे एमसीए सचिव अभय हडप यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---