वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) गयानामध्ये खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक वेस्ट इंडीज संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताया युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल या सामन्यात टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. भारतासाठी टी20 खेळणारा तो 105 वा खेळाडू ठरला.
भारतीय संघाला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. फिरकीपटू रवी बिश्नोई याला बाकावर बसवून कुलदीप यादवला संधी दिली. तर, पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेला सलामीवीर ईशान किशनला विश्रांती देत यशस्वी जयस्वाल याला पदार्पणाची संधी दिली गेली. भारतीय संघात उपकर्णधार सूर्यकुमार यादव याच्या हातून त्याला कॅप दिली गेली.
यशस्वी जयस्वाल याच्यासाठी मागील एक वर्ष अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघापर्यंतचा प्रवास केला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात त्याची बॅट चांगलीच बोलली.
राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीराची भूमिका पार पाडताना त्याने 14 सामन्यांमध्ये 48 च्या दमदार सरासरीने 625 धावा केल्या. यामध्ये एक शतक व चार अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएल इतिहासात कोणत्याही अनकॅप्ड कॅप खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्याला हंगामातील सर्वोत्तम युवा खेळाडू हा पुरस्कार देखील देण्यात आलेला.
यानंतर याच दौऱ्यावर त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. आपल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात 173 धावांची खेळी केली. तर, दुसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते. त्याच्या याच फॉर्ममूळे त्याला आगामी वनडे विश्वचषकात संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
(Yashasvi Jaiswal Makes T20 Debute Against West Indies IPL Performance Worth)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघात खळबळ! दिग्गज खेळाडूने संघाशी तोडला संबंध, अमेरिकडून मिळाली ऑफर
‘आम्ही दोन दिवसात…’, विश्वचषक तयारीविषयी भारतीय कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया