भारतीय संघाने १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता आणि आतापर्यंत भारतीय संघाने एकूण ९८७ वनडे सामने खेळले आहेत. यात भारताने ५१३ सामने जिंकले आहेत, तर ४२४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ९ सामने बरोबरीत आहेत तर ४१ सामन्यांचा कोणताही निकाल मिळाला नाही.
या ९८७ सामन्यांमध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक १५९ वनडे सामने खेळले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध भारताने १०० किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत. तर भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला ५० हून अधिक वनडे सामन्यांमध्ये पराभूत केले आहे.
या लेखात आपण अशा ४ संघाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना भारताने सर्वात जास्त वनडे सामन्यात पराभूत केले आहे:-
४. न्यूझीलंड (५५ सामने)
न्यूझीलंडविरुद्ध भारताने आतापर्यंत ११० वनडे सामने खेळले असून ५५ सामने जिंकले आहेत. तर ४९ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. तसेच १ सामना बरोबरीत झाला असून ५ सामान्यांचा निकाल लागू शकला नाही. मागील १० वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडला ५ सामन्यात पराभूत केले आहे.
दोन्ही संघांमधील पहिला सामना १९७५ च्या विश्वचषकात झाला होता, त्यात न्यूझीलंडने भारताला ४ विकेट्सने पराभूत केले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये शेवटची तीन वनडे सामन्यांची मालिका या दोन्ही संघात खेळली गेली होती, त्यामध्ये न्यूझीलंडने भारताला ३-० ने हरवले होते.
३. पाकिस्तान (५५ सामने)
भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाविरूद्ध भारताने १३२ वनडे सामने खेळले असून ५५ सामने. तर ७३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि ४ सामन्यांचा निकाल लागला नाही. मागील १० सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ सामन्यात पराभूत केले आहे. दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना १९७८ मध्ये झाला होता आणि त्या सामन्यात भारताने चार धावांनी विजय मिळवला होता. या दोन्ही संघांमध्ये २०१९ च्या विश्वचषकामध्ये शेवटचा सामना झाला होता आणि भारतीय संघाने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत केले होते.
२. वेस्ट इंडीज (६४ सामने)
वेस्ट इंडीज विरूद्ध भारताने आतापर्यंत १३३ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये ६४ सामने जिंकले असून ६३ सामने गमावले आहेत. या दोन संघांदरम्यान २ सामने बरोबरीत राहिले आणि ४ सामन्यांचा निकाल लागला नाही. गेल्या १० वनडे सामन्यांपैकी भारताने ७ सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव केला आहे.
१९७९ मध्ये विश्वचषकादरम्यान दोन्ही संघामध्ये पहिला वनडे सामना खेळाला गेला. त्यात वेस्ट इंडीजने भारताला ९ विकेट्सने हरवले होते. डिसेंबर २०१९ मध्ये या दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली होती, त्या वेळी भारताने वेस्ट इंडीजचा २-१ असा पराभव केला होता.
१. श्रीलंका (९१ सामने)
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक १५९ सामने खेळले आहेत आणि सर्वाधिक ९१ सामनेही जिंकले आहेत. श्रीलंकेने भारताला ५६ सामन्यात पराभूत केले आहे. दोन्ही संघांमध्ये एक सामना बरोबरीत झाला असून ११ सामन्यांचा निकाल लागला नाही. गेल्या १० सामन्यात भारताने श्रीलंकेला ८ वेळा पराभूत केले आहे.
दोन्ही संघांमधील पहिला सामना १९७९ मध्ये विश्वचषकादरम्यान झाला होता, त्यात श्रीलंकेने भारताचा ४७ धावांनी पराभव केला होता. या दोन्ही संघांची २०१९ च्या विश्वचषकात शेवटची लढत झाली होती आणि भारतीय संघाने श्रीलंकेला ७ विकेट्सने पराभूत केले होते.
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ६: ब्रेंडन मॅक्यूलमने भारताविरुद्ध केलेले झकास त्रिशतक
यशाच्या शिखरावर असताना निवृत्त झालेले तीन यष्टीरक्षक फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
झाडावर बसून ‘चिल’ करणारा विराट पाहिलाय का? पाहून व्हाल चकित…
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळाली सामान जप्त करण्याची धमकी, पाक बोर्ड म्हणतंय…
जेव्हा हा दिग्गज म्हणाला होता, ‘विराट कोहली नव्हे तर अजिंक्य रहाणेला करा भारताचा कर्णधार’