माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांनी बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची जागा घेणाऱ्या खेळाडूचे नाव दिले आहे. मात्र मांजरेकरांनी एक अट घातली आहे. तो म्हणाला की जर शमी बीजीटीसाठी फिट नसेल तर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप हा सर्वोत्तम पर्याय असु शकतो.
दुखापतीमधून कव्हर झाल्यानंतर शमी अनफिट असल्यामुळे बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून बीजीटी मालिकेला सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडणार आहेत. 27 वर्षीय आकाशने बांग्लादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी केली आहे.
क्रिकइन्फोवरील चर्चेदरम्यान मांजरेकर म्हणाले, “जेव्हा भारतीय संघ बीजीटीसाठी जातो तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ खूप डावखुरा असेल. आकाश राउंड द विकेट गोलंदाजी करतो. त्याची लाईन आणि लेंथ अचूक आहे. तो 140 नाही तर 135 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. पण त्याची ताकद अशी आहे की चेंडू अगदी सरळ हवेतून फिरवतो. माझ्या मते, जर मोहम्मद शमी तंदुरुस्त नसेल तर आकाश हा त्याचा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.” आकाश दीपने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले.
मोहम्मद सिराजपेक्षा आकाश दीप अधिक प्रभावी असल्याचे माजी क्रिकेटपटूचे मत आहे. तो म्हणाला, “डाव्या हाताच्या खेळाडूंविरुद्ध तो सिराजपेक्षाही अधिक प्रभाव पाडत आहे. त्याची कामगिरी पाहून बरे वाटते. चेन्नई कसोटीत त्याने केवळ 11 षटके टाकली. चेन्नईच्या पहिल्या डावात त्याने पाच षटकांत दोन बळी घेतले. दुसऱ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्या आहेत. तो एक चांगला भरवशाचा वेगवान गोलंदाज आहे. जो डाव्या फलंदाजांना त्रास देतो. पूर्वी इशांत शर्मा असे करायचा. आता सिराजसोबत आकाश दीप हे काम चांगल्या प्रकारे करू शकतो.
मोहम्मद शमीबद्दल बोलायचे झाल्यास, शमीने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. या स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली. मात्र टाचेच्या दुखापतीमुळे शमीला विश्वचषकानंतर बाहेर पडावे लागले. फेब्रुवारीमध्ये त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. बांग्लादेश मालिकेपर्यंत शमी तंदुरुस्त असण्याची शक्यता होती. पण तसे झाले नाही. तो पुढील महिन्यात न्यूझीलंड मालिकेत खेळणार की नाही हे सध्या निश्चित झालेले नाही.
हेही वाचा-
भारताच्या आणखी एका खेळाडूचा रस्ता अपघात, मोठ्या सामन्यातून बाहेर
IPL 2025: रिटेन्शन नियमांबाबत मोठे अपडेट, बेंगळुरूमध्ये बैठकीचे आयोजन, लवकरच होणार घोषणा
IND vs BAN; कानपूर कसोटीचा दुसरा दिवसही खोळंबला, पावसाची बॅटींग सुरुच