पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी शनिवारी भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेत आल्यावर भारत पाकिस्तान सामन्या विषयी तो म्हणाला, हा मोठा सामना आहे. पण कोणत्याही स्पर्धेमध्ये अंतिम सामना मोठा असतो. यादरम्यान त्याने सांगितले की भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतला ताप आला आहे.
दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी सामने खेळणारा भारतीय संघ आयसीसी अकॅडमी मध्ये सराव करत आहे. शनिवारी विराट कोहली सोबत काही खेळाडू वेळेच्या आधी एक तास मैदानावर येऊन सराव करत होते. यानंतर बाकीचे खेळाडू सरावासाठी आले परंतु ऋषभ पंत आला नाही तसेच शुक्रवारी सरावा दरम्यान तो उपस्थित होता.
शनिवारी संघासोबत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत नव्हता. रिपोर्टर्सशी बोलताना भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिलने सांगितले की, ऋषभ पंतला ताप आला आहे, यामुळे तो सरावासाठी येऊ शकला नाही. तसेच रिषभ पंत बांगलादेश विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळला नव्हता.
शुबमन गिलने उपकर्णधार पदाच्या जबाबदारी विषयी तो म्हणाला की, उपकर्णधार पदामुळे काहीही बदललं नाही. मी जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा फलंदाज म्हणूनच खेळतो. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्यामुळे काही बदलणार नाही, आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळतो.
भारत आणि पाकिस्तान संघाच्या सामन्यामध्ये कायमच चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. हा सामना या कारणामुळे ही मोठा ठरतो कारण दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेतच समोरासमोर खेळतात. तसेच चाहत्यांना या सामन्यासाठी खूप काळ वाट पाहावी लागते.
रविवारी होणारा सामना पाकिस्तानसाठी करा नाही तर मरा असणार आहे. जर पाकिस्तान संघ हरला तर चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडेल.
हेही वाचा
इंग्लंडच्या बेन डकेटने रचला नवा इतिहास, भारतीय दिग्गजांना सोडले मागे!
चॅम्पियन्स ट्रॉफीतील महासंग्राम: भारत-पाकिस्तान सामना कोण मारेल बाजी?
पाकिस्तानी मैदानावर भारतीय राष्ट्रगान! PCB वर सोशल मीडियावरती तुफान टीका






