भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आज कॅनबेरा येथे प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने टी२० मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. भारताच्या विजयात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज टी नटराजन व कन्कशन सब्टीट्यूट म्हणून मैदानात आलेल्या युझवेंद्र चहल यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या कामगिरी सोबतच नटराजन व चहल यांनी एका खास यादीत आपले नाव समाविष्ट केले. भारताकडून एकाच टी२० सामन्यात एका फिरकी व एका वेगवान गोलंदाजाने तीन-तीन बळी मिळवण्याची ही अवघी चौथी वेळ आहे.
भारताचा विजयी प्रारंभ
कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १६१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. भारताकडून उपकर्णधार केएल राहुलने सर्वाधिक ५१ धावा ठोकल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने २३ चेंडूत ४४ धावांची आक्रमक खेळी केली. उत्तरादाखल, भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीने ऑस्ट्रेलियन फलंदाज अवघ्या १५० धावा काढू शकले. भारताकडून युझवेंद्र चहल व टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. युझवेंद्र चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नटराजन-चहलची कमाल
भारताला हा सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या टी नटराजन व युझवेंद्र चहलने या सामन्यात एक विशेष कामगिरी केली. या दोघांनी प्रत्येकी तीन-तीन बळी घेतले. याच बरोबर एकाच टी२० सामन्यात भारताकडून एका फिरकी व एका वेगवान गोलंदाजाने तीन बळी मिळवण्याची ही चौथी वेळ ठरली.
या तीन जोड्यांनी केली आहे यापूर्वी अशी कामगिरी
भारताकडून सर्वप्रथम एकाच सामन्यात तीन-तीन बळी घेण्याची कामगिरी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपति बालाजी व अष्टपैलू फिरकीपटू युवराज सिंह यांनी केली होती. या दोघांनी २०१२ टी२० विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध असा कारनामा सर्वप्रथम केलेला. त्यानंतर, २०१७ मध्ये जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांनी इंग्लंडविरुद्ध, तर हार्दिक पंड्या व युझवेंद्र चहल यांनी श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी तीन बळी मिळविले होते.
नटराजन-चहलची कामगिरी आहे अनेक अर्थांनी खास
आज नटराजन व चहल यांनी केलेली कामगिरी अनेक अर्थांनी वेगळी आहे. या दोघांनी ही कामगिरी ऑस्ट्रेलियात केल्याने, आशिया खंडाबाहेर एका सामन्यात प्रत्येकी तीन बळी मिळवणारे हे पहिले गोलंदाज आहेत. आज नटराजन आपले टी२० पदार्पण करत होता तर चहल हा कन्कशन सब्टीट्यूट म्हणून मैदानात उतरलेला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बर्फ खांद्यावर काय करतोय, तो तर ग्लासमध्ये पाहिजे’, दोन जडेजांमधील चर्चेचा Video भन्नाट व्हायरल
Video: चेंडू लागला जडेजाच्या हेल्मेटला अन् त्रास झाला ऑस्ट्रेलियाला
‘गब्बर’ धवनची जुनी कमजोरी आली समोर; पाहा Video
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर