भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सिडनीतील तिसरी कसोटी अविश्वसनीय झुंज देत अनिर्णीत राखली. शेवटच्या दिवशी ९७ षटके खेळून काढत केवळ ३ बळी गमावले. यात सगळ्याच फलंदाजांनी आपले योगदान दिले. रिषभ पंतने ९७ धावांची आक्रमक खेळी साकारली तर चेतेश्वर पुजाराने ७७ धावांची जिगरबाज खेळी उभारली.
मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर सामना वाचवण्याची जबाबदारी खांद्यावर घेत आर अश्विन आणि हनुमा विहारीने संपूर्ण सत्र एकही गडी न गमावता खेळून काढले. विशेषतः अश्विनने एक गोलंदाज असूनही फलंदाजीत दिलेले योगदान संघासाठी महत्वपूर्ण ठरले. मात्र सामना संपल्यानंतर अश्विनच्या पत्नीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
अश्विनची पत्नी प्रिथी अश्विनने ट्विटरवर पोस्ट लिहित हा खुलासा केला आहे. यात तिने अश्विन पाचव्या दिवशी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, असे उघड केले आहे. तिने लिहिले, “अश्विनला काळ पाठीला हिसका बसला होता. रात्री झोपायला गेला तेव्हाही त्याला त्रास होत होता. सकाळी उठल्यावर तर त्याला उभेही राहता येत नव्हते आणि प्रचंड वेदना होत होत्या. बुटाची लेस बांधण्यासाठी वाकणेही त्याला कठीण होत होते. मात्र असे असतानाही त्याने आज जी खेळी उभारली आहे, ती अविश्वसनीय आहे.”
https://twitter.com/prithinarayanan/status/1348542761134301185
आर अश्विन या सामन्यात गोलंदाजीत फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र फलंदाजीत अतिशय महत्वपूर्ण योगदान देत त्याने संघाला मालिकेत आव्हान कायम राखण्यास मदत केली आहे. या मालिकेतील चौथा सामना आता १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! विराट कोहली बनला बापमाणुस; अनुष्काने दिला गोंडस मुलीला जन्म
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाचे मनोबल उंचावण्याचे केले तोकडे प्रयत्न, मात्र पडले तोंडघशी! पाहा व्हिडिओ
शब्बास रे पठ्ठ्यांनो!! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना अनिर्णित झाल्यावर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव