भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ विजयी वाटचाल करत २-१ ने पुढे आहे. नुकत्याच झालेल्या तिसऱ्या (दिवस रात्र कसोटी) सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघांवर १० गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयानंतर इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तसेच भारतीय संघाला चौथा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याची संधी मिळणार आहे. अशातच २०२० मध्ये कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या स्पर्धेला यावर्षी देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे पुढे ढकलण्यात येऊ शकते.
२०२० मध्ये जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे क्रिकेट क्षेत्र ठप्पा पडले होते. अशातच आशिया चषक २०२० स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला होता. ही स्पर्धा येत्या जून महिन्यात श्रीलंकेत खेळवली जाणार होती. परंतु भारतीय संघ लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रबळ दावेदार आहे. हा अंतिम सामना १८ जून ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धा स्थगित केली जाऊ शकते.
पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांचे म्हणणे आहे की, “दोन्ही स्पर्धा एकाच तारखेला येत असल्याने गोंधळ होत आहे. भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंड संघावर १० गडी राखून विजय मिळवला आहे. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला परभवापासून वाचायचे आहे. अशात जर भारताने हा सामना जिंकला तर आशिया चषक २०२३ पर्यंत स्थगित करावे लागू शकते.”
आशिया चषक स्पर्धा पाकिस्तान मध्ये खेळवण्यात येणार होती. परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बीसीसीआयने स्पर्धेचे स्थळ बदलण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG: टीम इंडियाने इंग्लंडच्या ‘या’ उणीवेचा फायदा घेतला; माजी दिग्गजाने मांडले मत
बड्डेच्या दिवशीच क्रिकेटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, कोरोना झाल्यामुळे करावं लागलं दाखल
कुणी तरी येणार येणार गं! युवराज सिंग लवकरच होणार बाबा? चर्चेला आले उधाण