बीसीसीआय (BCCI) सध्या आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या आयोजनाच्या तयारीत व्यस्त आहे. पुढच्या महिन्यात यासाठी बीसीसीआय एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करणार आहे, या बैठकीत सर्व फ्रँचायझी सहभागी असतील. सध्या भारतात कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने वाढताना दिसत आहे आणि येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात येत्या काळातील परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने बीसीसीआयचे प्रयत्न असतील आणि बैठकीत याच विषयावर चर्चा केली जाईल.
माध्यामांतील वृत्तानुसार बीसीसीआय आयपीएलच्या पुढच्या हंगामाला एप्रिलमध्ये चेन्नईमधून सुरुवात करू शकते. पुढच्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत बीसीसीआय आयपीएलसाठी दोन वेगवेगळे प्लॅन तयार करणार आहे. जर कोरोनाची परिस्थिती बिघडली नाही, तर आयपीएलचे सामने होम (घरच्या मैदानावर) आणि अवे (प्रतिस्पर्धीच्या घरच्या मैदानावर) या आधारावर आयोजित केले जातील.
परंतु, परिस्थिती बिघडली, तर दुसरा पर्यायही तयार ठेवावा लागणार आहे. यावर्षी पार पडलेल्या आयपीएलमध्ये दुसरा पर्याय तयार नसल्यामुळे स्पर्धा अर्ध्यातून स्थगित करण्याची वेळ आली होती आणि उर्वरित सामने नंतर यूएईत खेळवले गेले होते.
अधिक वाचा – सतरा वर्षे आणि सतरा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
मुंबई-पुण्यात आयपीएलच्या आयोजनावर होईल विचार
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार फ्रेँचायझींच्या अधिकाऱ्याने पुढच्या महिन्यात होणाऱ्या बैठकीविषयी माहिती देताना सांगितले की, “ही बैठक प्रामुख्याने दोन नवीन फ्रँचायझ लखनऊ आणि अहमदाबाद यांना बीसीसीआयच्या कामकाजाची ओळख करून देण्यासाठी होईल. पण सोबतच कोविडची परिस्थिती पाहून स्पर्धेला मुंबई आणि पुण्यात आयोजित करण्याविषयी किंवा गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोदा आणि राजकोटमध्ये आयोजित करण्याविषयी देखील विचार केला जाईल. बैठकीत मालकांना पर्यायांविषयी माहिती देणे, यावर देखील लक्ष असेल.”
यावेळी काही फ्रँचायझींच्या अधिकाऱ्यानी अशीही माहिती दिली की, आयपीएलचे आयोजन यूएईत करण्याविषयी कसलाच विचार नाही.
व्हिडिओ पाहा – आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत
तत्पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने २०२० आयपीएल यूएईत आयोजित केली होती. त्यानंतर २०२१ आयपीएल भारतात आयोजित केली गेली होती, पण कोरोनाच्या वाढता प्रसार आणि संघांच्या सपोर्ट्स स्टाफमधील काही सदस्य संक्रमित आढळल्यानंतर स्पर्धा आर्ध्यातून स्थगित केली गेली होती. आता पुढच्या हंगामात स्पर्धा आर्ध्यातून स्थगित करण्याची वेळ येऊ नये, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असेल.
महत्वाच्या बातम्या –
“त्याच्या पायात स्प्रिंग आहे…”; खुद्द मास्टर-ब्लास्टरने गायले युवा भारतीय गोलंदाजाचे गुणगान
सरावातून वेळ काढत टीम इंडियाची सिनीयर मंडळी पोहोचली सैरसपाट्याला