भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वुमेन प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम यावर्षी मार्च महिन्यात खेळला गेला. प्रथम झालेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मुंबई इंडियन्सने या पहिल्या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. त्यानंतर आता या स्पर्धेचा दुसरा हंगाम पुढील वर्षी दिवाळीत खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.
वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या यशानंतर ही स्पर्धा पुढील वर्षी आणखी शहरांमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. स्पर्धेचे पहिले वर्ष असल्याने या स्पर्धेत सहा संघ सहभागी झालेले. या सर्व संघांचे सामने मुंबई येथील तीन मैदानांवर घेण्यात आलेले. स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व यशानंतर बोलताना जय शहा म्हणाले,
“वुमेन्स प्रीमियर लीग यशस्वी होण्याची आम्हाला खात्री होती. आता पुढील वर्षी स्पर्धेला विंडो कशी मिळेल, याचा आम्ही विचार करत आहोत. आमच्यातील बऱ्याच लोकांचा असा अंदाज आहे की, पुढील वर्षी दिवाळीच्या दरम्यान दुसरा हंगाम झाल्यास त्याला देखील लोकांचा मोठा पाठिंबा मिळेल. याबाबत सविस्तर चर्चा होऊन निर्णय जाहीर केला जाईल.”
डब्लूपीएल स्पर्धेलाही शेकडो कोटींच्या आयपीएल फ्रॅंचाईजी लाभल्या आहेत. तसेच स्पर्धेचे प्रसारण हक्क देखील अशाच किमतींमध्ये विकले गेले. पहिल्या हंगामातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. स्पर्धेतील पाच फ्रॅंचाईजीपैकी तीन फ्रॅंचाईजी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी नावे केलेल्या. या व्यतिरिक्त गुजरात जायंट्स व युपी वॉरियर्झ स्पर्धेत सहभागी झालेले.
(BCCI Secretary Jay Shah Indicate WPL Next Season Happens In Diwali)
महत्वाच्या बातम्या-
MPL मधून मिळाली महाराष्ट्राची ‘यंग ब्रिगेड’! भविष्यात ठोठावतील टीम इंडियाचे दार
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा