नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर भालाफेक करत भारताला ऍथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले. पण अंतिम सामन्यापूर्वी नीरजसाठी सर्व काही ठीक नव्हते. त्याला त्याचा भाला सापडला नव्हता. हे घडले कारण त्याचा भाला पाकिस्तानच्या भालाफेकपटू अरशद नदीम याच्या जवळ होता. याचा खुलासा खुद्द नीरजने केला आहे.
नीरजने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “फायनल सुरू होण्यापूर्वी मी माझा भाला शोधत होतो. मला भाला मिळत नव्हता. अचानक मला अरशद नदीम माझा भाला घेऊन चालताना दिसला. मी त्याला म्हणालो, ‘भाऊ, हा माझा भाला आहे, तो मला परत दे.’ मला त्याला फेकायचे आहे. मग त्याने भाला मला परत केला. तेव्हाच तुम्ही पाहिले असेल की, मी माझी पहिली फेकी अतिशय घाईने केली.”
नीरज पुढे म्हणाला, “अरशदने पात्रता फेरीत खूप चांगली कामगिरी केली. फायनलमध्ये देखील तो चांगला खेळला. मला वाटते की, पाकिस्तानसाठी हे चांगले आहे की, त्यांना भालाफेकमध्ये रस दाखवण्याची चांगली संधी आहे. तो भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकतो.”
नीरजने पाकिस्तानी जनतेला एक संदेश देखील दिला आहे. तो म्हणाला की, ”अरशदला पाठिंबा द्या. त्यानी भालाफेकमध्ये पाकिस्तानला ओळख दिली आहे आणि त्याला तुमच्या सहकार्याची गरज आहे.”
अरशद टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी पदकाचा दावेदार होता. परंतु, ८४. ६२ मीटरची त्याची सर्वोत्तम फेकी पदकासाठी पुरेशी नव्हती. यापूर्वी अर्शदने ८५.१६ मीटर फेकीसह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. ग्रुप बी मध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता.
नीरज आणि अरशद यांच्यात चुरशीची स्पर्धा
अरशदने नीरजला त्याचा आर्दश म्हटले आहे. ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाइटच्या प्लेयर प्रोफाइल विभागात अरशदने नीरजला आपला हिरो असल्याचे म्हटले आहे.
ऑलिम्पिकमधील कोणत्याही ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला अरशद पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे. नीरज आणि अरशद नदीम टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी देखील आमने-सामने आले होते. जिथे दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती.
दक्षिण आशियाई २०१६ मध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धेत अरशदने कांस्यपदक जिंकले. सुवर्णपदक नीरजच्या नावावर होते. त्यानंतर अरशदने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. जिथे नीरजने पुन्हा सुवर्णपदकावर कब्जा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
अख्ख्या टीम इंडियाला पुरून उरले इंग्लंडचे दोन पठ्ठे! इतिहासात चौथ्यांदा रचली गेली ‘अशी’ भागीदारी
जोफ्रा आर्चर क्रिकेटमध्ये नक्की कधी करणार पुनरागमन? स्वत: वेगवान गोलंदाजानेच दिले उत्तर
वडील होते कांबळीचे मोठे फॅन, म्हणून मुलीला म्हणायचे विनोद; आज तिनेच टीम इंडियात मिळवून दाखवले स्थान