भारताचा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर, भारतीय चाहत्यांची निराशा झाली कारण दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली होती. खरंतर, हे दोन्ही दिग्गज टी-20 आणि कसोटीतून निवृत्त झाले आहेत. चाहत्यांनी त्यांना शेवटचे आयपीएल 2025 दरम्यान खेळताना पाहिले होते.
श्रीलंका क्रिकेटने या संधीचा फायदा घेत ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर BCCI 6 सामन्यांची मर्यादित षटकांची मालिका आयोजित करण्याची ऑफर दिली. या मालिकेसाठी श्रीलंकेला बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कळाल्याने चाहत्यांना लवकरच रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर दिसतील अशी अपेक्षा आहे. या आठवड्यात सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीदरम्यान अंतिम चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
🚨 CHANCES BRIGHT FOR INDIA Vs SRI LANKA WHITE BALL SERIES 🚨
— Tanuj (@ImTanujSingh) July 19, 2025
– A senior Official of Sri Lanka cricket cricket confirms They have received positive feedback from BCCI for their request of hosting Team India for white ball series. (Telecomasia. Net). pic.twitter.com/hILUxu4vlv
इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारत 17 ऑगस्टपासून बांगलादेशचा दौरा करणार होता. तथापि, बांगलादेशमधील सुरक्षेच्या कारणास्तव, दोन्ही देशांच्या बोर्डांनी 2026 पर्यंत दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका क्रिकेटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ला सांगितले की, “आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत पुढील चर्चा होईल. आम्हाला दोन किंवा तीन दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.”
जर दौऱ्याला मान्यता मिळाली तर मालिका कोलंबो आणि कॅंडी येथे आयोजित केली जाऊ शकते. श्रीलंकेने यापूर्वी तीन सामन्यांचे एकदिवसीय आणि समान संख्येने टी20 सामने खेळण्याची ऑफर दिली होती, परंतु पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाला लक्षात घेऊन टी20 मालिकेतील सामन्यांची संख्या देखील वाढवता येते.






