वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (West Indies Tour Of India) असून उभय संघांमध्ये रविवारपासून (०६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपासून रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून काम पाहिल. दोन्ही संघात जगातील सर्वात मोठ्या अहमदाबाद स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या वनडे (First ODI) सामन्यापूर्वी रोहितने पत्रकार परिषद (Rohit Sharma Press Conference) घेतली आहे.
या पत्रकार परिषदेत रोहितने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या असून त्याने कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या जोडीच्या पुनरागमनावरही प्रतिक्रिया दिली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘कुलचा‘ जोडी (Kulcha Pair) ला संधी दिली जाईल असे रोहितने म्हटले आहे.
एमएस धोनीच्या कार्यकाळात कुलचा जोडी प्रकाशझोतात आली होती. धोनीच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये आपल्या प्रदर्शनाची छाप सोडली होती. हे दोन्ही फिरकीपटू संघाला महत्त्वाच्या क्षणी विकेट्स मिळवून देत असत. परंतु धोनीच्या निवृत्तीनंतर त्यांना एकत्र जास्त संधी मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक प्रदर्शनातही हळूहळू बिघाड होत गेले. मात्र आता रोहितने पुन्हा एकदा या जोडीचा संघाला फायदा करवून घेण्याचे ठरवले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला की, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे यापूर्वी भारतीय संघाच्या उमदा गोलंदाजांपैकी एक राहिले आहेत. त्यांनी मिळून शानदार प्रदर्शन करत त्यांचा ठसा उमटवला आहे. परंतु पुढे आम्हाला (संघाला) पाहिजे असणाऱ्या वेगवेगळ्या संघ संयोजनांमुळे त्यांना पुरेशा संधी मिळाल्या नाहीत. परंतु माझ्या डोक्यात आले की, आपण त्यांना पुन्हा एकत्र संधी देऊन पाहू.
हेही वाचा- पहिल्या वनडेत ‘हा’ असेल रोहितचा सलामी जोडीदार, पत्रकार परिषदेत नव्या कर्णधाराचा खुलासा
वेस्ट इंडिजविरुद्ध भारत खेळेल १०००वा वनडे सामना
भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात आत्तापर्यंत १३३ वनडे सामने खेळले आहेत. यातील ६४ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तसेच वेस्ट इंडिजने ६३ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले आहेत, तर ४ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
विशेष गोष्ट अशी की, भारत आणि वेस्ट इंडिज संघात ६ फेब्रुवारी रोजी होणारा वनडे सामना हा भारताचा १००० वा वनडे सामना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेत ‘हा’ असेल रोहितचा सलामी जोडीदार, पत्रकार परिषदेत नव्या कर्णधाराचा खुलासा
फायनलपूर्वी व्हिडिओ कॉलवर वडिलांशी काय झालं कर्णधार यशचं बोलणं? संघाच्या प्लॅनचाही कोचकडून खुलासा
विश्वचषकात मालिकावीर ठरला की तो खेळाडू १०० टक्के टीम इंडियात येतोच, मग यंदा कोण मिळवेल तो मान?