आगामी टी२० विश्वचषाकला १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि दोन वेगवेगळ्या देशांमध्ये विश्वचषक खेळला जाणार असल्यामुळे आयसीसी पूर्ण खबरदारी घेत आहे आणि स्पर्धेयसाठी कडक बायो-बबलचे नियोजन केले गेले आहे. यासाठी फॉर्मूला १, यूरो २०२०, आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये जैव सुरक्षेशी संबंधित असलेल्या तज्ञांची मदत घेतली गेली आहे.
आयसीसीचे बायो सेफ्टी प्रमुख ऍलेक्स मार्शल यांनी याबबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कसलीच कमी सोडू इच्छित नाहीत. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक, यूरो २०२० आणि फार्मूला १ साठी सुरक्षेची देखरेक करणाऱ्या तज्ञांसोबत चर्चा केली आहे. येथे आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पाही खेळला जात आहे. यापूर्वी अनेक मालिकाही झाल्या आहेत. यामधून आम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळाले आहे आणि टी२० विश्वचषकाचा बायो बबलचे नियम तयार करण्यामध्ये मदत मिळाली.
असे असतील नियम
टी२० विश्वचषकात सहभाग घेण्यासाठी आलेल्या संघांतील सदस्यांना ६ दिवस विलगीकरणात ठेवले जाईल. या सहा दिवसांमध्ये संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या तीन चाचण्या घेतल्या जातील आणि त्यानंतर खेळाडू आणि संघातील इतर सदस्यांना स्पर्धेत समील होण्याची परवानगी देण्यात येईल. बायो बबलमधील एखादा खेळाडू किंवा संघाच्या सपोर्ट स्टाफधील अन्य कोणत्या सदस्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याला १० दिवसांसाठी विलगीकरणात ठेवले जाईल.
कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या व्याक्तीला ६ दिवसांच्या विलगीकरणात ठेवले जाईल. तसेच जो व्यक्ती कोरोणाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता, पण त्याने तोंडावर मास्क लावले असेल, तर त्याल केवळ २४ तासांसाठी वेगळे राहावे लागेल. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली, तर त्याला बाहेर सोडले जाईल.
आयसीसीने विश्वचषकाच्या दृष्टीने एक बोयो सिक्योर दवाखानाही तयार केला आहे. जर गरज पडल्यास कोरोना संक्रमित व्यक्तींवर तेथे उपचार केले जातील.
तसेच ओमान आणि अबुधाबीमध्ये स्टेडियमध्ये जाऊन सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असणार आहे. पण दुबई आणि शारजाहमध्ये हा नियम नाही. तसेच दर्शकांनी स्टेडियममध्ये सामना पाहताना मास्क घालने बंधनकारक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराह ऑन फायर! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा चौथाच भारतीय गोलंदाज
मुंबईच्या फलंदाजांनी सनरायझर्सचा उडवला धुव्वा, संघाला गाठून दिली आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या
हायवोल्टेज ड्रामा! आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक झालेले तीन अंतिम सामने