भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि त्याच्या पत्नी अनुष्का शर्मा (anushka sharma) यांना मागच्या वर्षी ११ जानेवारी रोजी मुलगी झाली. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका (vamik kohli birthday) ठेवले. मंगळवारी (११ जानेवारी) वामिकाचा पहिला वाढदिवस होता. विराट आणि अनुष्काने वामिकाचा पहिला वाढदिवस संघातील खेळाडू आणि त्यांच्या परिवारासोबत साजरा केला आहे. परंतु चाहत्यांना वामिकाचा चेहरा तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील पाहायला मिळाला नाही.
विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचा चेहरा अजूनपर्यंत एकदाही सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याच माध्यमातून जगासमोर येऊ दिलेला नाही. अशात चाहत्यांना तिचा चेहरा पाहण्याची नेहमीच उत्सुकता असते, परंतु यावेळीही चाहत्यांची निराशा झाली आहे. अनुष्का शर्माने वामिकाच्या वाढदिवसानिमित्त दोन फोटो शेअर केले होते, परंतु काही वेळातच तिने हे फोटो डिलीट देखील केले.
असे असले तरी, अनुष्काने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंपैकी एकामध्ये विराट आणि अनुष्का दिसत आहेत, तर दुसऱ्यामध्ये अनुष्काने वामिकाला उचलून घेतलेले दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अनुष्या आणि वामिका दोघींनीही पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. पण वामिकाचा चेहरा या दोन्ही फोटोत पाहायला मिळत नाही.
भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना केप टाऊनमध्ये सुरू आहे. भारतीय संघासोबत त्यांची कुटुंबदेखील या दौऱ्यावर आहेत. अशात विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस संघातील खेळाडूंसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत साजरा केला. भारताचा अनुभवी खेळाडू रिद्धिमान साहाची पत्नी रोमी मित्राने तिच्या सोशल मीडिया खात्यावरून वामिकाच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोंमध्ये देखील चाहत्यांना वामिकाचा चेहरा दिसलेला नाही.
दरम्यान, भारत आणि दक्षिण अफ्रिकेत सध्या सुरु असलेला तिसरा कसोटी सामना केप टाऊनमध्ये खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस विराट कोहलीसाठी उत्तम राहिला. विराट कोहलीने सामन्याच्या पहिल्या दिवशी ७९ धावांची महत्वाची खेळी केली. वामिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराटने त्याच्या कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक पूर्ण केले. विराटने सामन्याच्या पहिल्या दिवशी महत्वाची खेळी केली असली तरी, खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. एका बाजूने विराट टिकून खेळत राहिला, तर दुसऱ्या बाजूने भारताचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत राहिले. परिणामी पहिल्या दिवशी भारतीय संघ २२३ धावांवर सर्वबाद झाला.
महत्वाच्या बातम्या –
स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत रायझिंग चॅम्पियन संघाचा विजय
स्मिथचा ‘कार’तोड षटकार एकदा पाहाच, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
‘हे’ ५ अनकॅप्ड खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये करू शकतात पदार्पण, यादीत एक वेगवान गोलंदाजही सामील
व्हिडिओ पाहा –