बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने नेदरलँड्सविरुद्ध संघाच्या पराभवानंतर एक धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी तमीम इक्बालच्या संदर्भात झालेल्या संपूर्ण वादाचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला असावा, असे त्याने म्हटले आहे. शाकीब अल हसनच्या मते, यामुळे संघाचे मनोबल खालावले असावे, असे मला वाटते.
विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी तमीम इक्बाल (Tamim iqbal) आणि शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) यांच्यात वाद झाला होता. तमिम इक्बालने सांगितले होते की, विश्वचषकात आपण केवळ पाच सामने खेळू शकू. यानंतर शाकिब अल हसनने त्याला संघात घेण्यास नकार दिला होता. सोशल मीडियावरही याविषयी बरीच चर्चा झाली होती.
शाकीब अल हसनच्या मते, तमिम इक्बाल वाद हा संघाच्या खराब कामगिरीचे कारण असू शकते. पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला, “या वादाचा परिणाम संघावर झाला असावा. एखाद्या खेळाडूच्या मनात काय चालले आहे हे तुम्हाला माहीत नाही पण त्याचा आमच्यावर परिणाम झाला असेल हे मी नाकारत नाही.”
विश्वचषक 2023 च्या 28 व्या सामन्यात नेदरलँड्सने बांगलादेशचा 87 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 50 षटकांत 229 धावा केल्या, प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 42.2 षटकांत केवळ 142 धावा करत सर्वबाद झाला. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 68 धावांची शानदार खेळी खेळली, तर गोलंदाजीत पॉल व्हॅन मीकरेनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा 6 सामन्यांमधील हा पाचवा पराभव असून ते विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यांनी केवळ अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकला होता. (Due to the dispute with Tamim Iqbal the team shocking statement of the Bangladesh captain)
म्हत्वाच्या बातम्या
CWC23 : सलग चौथा सामना जिंकल्यानंतर काय होत्या कमिन्सच्या भावना? म्हणाला, ‘विरोधी संघाने आम्हाला…’
ऑरेंज आर्मीची जय! नेदरलँड्सकडून बांगला टायगर्सची शिकार, बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट