भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या मार्गावर होता, मात्र संघाच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला. सामन्याच्या पहिल्या डावानंतर संघ २७ धावांनी मागे होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने केवळ ५५ धावांमध्ये ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र, दोन अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पार पाडली. यानंतर आता अजिंक्य रहाणेने सांगितले आहे की, भागिदारीदरम्यान त्याचे पुजारासोबत काय बोलणे झाले?