---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडने टीम इंडियाची लाज काढली; भारताला 4-0 ने चारीमुंड्या चित केलं

On: रविवार, जुलै 12, 2026 6:38 AM
---Advertisement---

साउथम्प्टन येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात, इंग्लंडने भारताचा 56 धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताला एकही सामना जिंकता न येण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ ठरली.

शनिवारी (11 जुलै) झालेल्या या सामन्यात, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारताला महागात पडला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 257 धावांचा डोंगर उभारला.

इंग्लंडसाठी जोस बटलरने केवळ 64 चेंडूंत 131 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये 12 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. कर्णधार हॅरी ब्रुकनेही 45 चेंडूंत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 95 धावांची नाबाद आणि दमदार खेळी साकारली. फिल सॉल्ट 9 चेंडूंत 6 धावा करून बाद झाला, तर जेकब बेथेलला त्याने सामना केलेल्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद व्हावे लागले. विल जॅक्सने 2 चेंडूंत 7 धावा केल्या.

२५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या 21 असताना अभिषेक शर्मा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनने 14 चेंडूंत 27 धावा केल्या, पण संघाची धावसंख्या 55 ​असताना त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या विकेटसाठी 30 चेंडूंत 55 धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयस अय्यर 16 चेंडूंत 28 धावा करून बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा एकदा डगमगला. ईशान किशनने 35 चेंडूंत 56 धावा केल्या, तर तिलक वर्माने 25 चेंडूंत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली; तरीही ते भारताला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

मर्यादित 20 षटकांत भारताचा डाव 8 बाद 201 धावांवर संपला आणि इंग्लंडने 56 धावांनी सामना जिंकत मालिका 4-0 अशी खिशात घातली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---