बंगळूरु। बुधवारी(27 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर दोन सामन्यांची टी20 मालिकाही 2-0 अशा फरकाने जिंकली.
हा सामना भारताला गमवावा लागला असला तरी भारताचे आजी-माजी कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनीसाठी विशेष ठरला आहे. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 षटकारांचा टप्पा पार केला आहे. यासामन्याआधी हा टप्पा पार करण्यासाठी धोनीला एका षटकाराची तर विराटला दोन षटकारांची गरज होती.
बुधवारी पार पडलेल्या या सामन्यात धोनीने 3 षटकार आणि 3 चौकारासह 23 चेंडूत 40 धावा केल्या आहेत. तर विराटने 38 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 72 धावा केल्या. तसेच या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारीही रचली आहे.
त्यामुळे धोनीचे आता आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 98 सामन्यात 52 षटकार झाले आहेत, तर विराटचे 67 सामन्यात 54 षटकार झाले आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 षटकारांचा टप्पा याआधी रोहित शर्मा, युवराज सिंग आणि सुरेश रैना तीन खेळाडूंनी पार केला आहे.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू-
102 – रोहित शर्मा
74 – युवराज सिंग
58 – सुरेश रैना
54 – विराट कोहली
52 – एमएस धोनी
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे एमएस धोनीच आहे टीम इंडियाचा षटकार किंग…