प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की भविष्यात त्याला आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळावी. काही क्रिकेटपटू असेही असतात, ज्यांना आपल्या संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी तर मिळते. पण पुढे त्यांचे संघातील स्थान कायम न राहिल्याने ते सातत्याने आत-बाहेर होत असतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘चायनामन’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय गोलंदाज कुलदीप यादव. याच कुलदीपला कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्ट याने पुनरागमनासाठी मोलाचा मंत्र दिला आहे.
या २६ वर्षीय फिरकीपटूला अपेक्षेप्रमाणे खेळण्याची संधी मिळताना दिसत नाही. गतवर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला अवघे ४ वनडे सामने खेळायला मिळाले होते. उर्वरित टी२० आणि कसोटी मालिकेत तो बाकावर बसून होता. त्यानंतर मागील इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतही त्याला दुर्लक्षित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर, आयपीएल २०२१ मध्ये त्याची फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सनेही त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.
माजी पाकिस्तानी कर्णधार सलमान बट्टच्या मते कुलदीपमधील आत्मविश्वासाची कमतरता यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे त्याने कुलदीपला अधिकाधिक देशांतर्गत सामने खेळण्याचा सल्ला दिला आहे.
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना सलमान बट्ट म्हणाला की, “कसोटी क्रिकेटचे स्वरुप तुम्हाला चेंडूवर नियंत्रण मिळवून देण्यात मदत करते. कुलदीपने मागील बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. आर अश्विन आणि इतर फिरकीपटूंना भारतीय संघाने कसोटीत संधी दिली आहे. मला वाटते की, कुलदीपमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. त्यामुळे त्याला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकावे लागणार आहे. तो जितकी जास्त गोलंदाजी करेल, तितका त्याचा आत्मविश्वास वाढेल. रणजी ट्रॉफीचा एक हंगाम यासाठी पुरेसा आहे. त्याच्यात प्रतिभेची अजिबात कमी नाही. फक्त तो सध्या खराब फॉर्ममध्ये आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या पत्नीचे विराटशी होते खास नाते, सिनेमा थिएटरबाहेर एकत्र दिसल्याने झाली होती खूप चर्चा
“अनिल कुंबळेने अनेकदा माझी रात्रीची झोप उडवली होती,” सार्वकालिन फलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य
मॅच फिक्सिंगची एक चूक अन् कारकिर्दीवर लागला पूर्णविराम; नाहीतर आज असता जडेजाचा पर्यायी अष्टपैलू!