भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी त्या खेळाडू बद्दल भाष्य केले आहे, जो इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी मॅच विनर ठरू शकतो. रेवस्पोर्ट्ज़ सोबत बातचीत करताना गांगुली म्हणाले, इंग्लंड दौऱ्यावर भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तो खेळाडू ठरू शकतो जो भारतासाठी कसोटी मालिका जिंकून देऊ शकतो. ते म्हणाले, गिलने (Shubman gill) हे ठरवायला हवे की, बुमराह आता उरलेल्या वेळेमध्ये फक्त 12 षटके गोलंदाजी करेल आणि बुमराहला टीम इंडियाच्या मुख्य विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या स्वरूपात त्याचा वापर करायला हवा.
गांगुली यांनी म्हटले, बुमराह भारतीय संघासाठी योग्य खेळाडू आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून सलग गोलंदाजी करून घेऊ शकत नाही. कर्णधाराला या गोष्टीचे ध्यान ठेवणे आवश्यक आहे. त्याला विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या रूपात वापरले पाहिजे. एका दिवशी 12 षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी त्याच्याकडून करून घेऊ नये. दुसऱ्या गोलंदाजांनाही खेळवणे गरजेचे आहे. जर तुम्ही बुमराहला वाचवून ठेवू शकता आणि त्याला जेव्हा विकेटची आवश्यकता आहे, तेव्हाच खेळू शकता तर तुमच्याकडे निश्चित स्वरूपात संधी असेल.
जर भारताने चांगली फलंदाजी केली आणि जसप्रीत बुमराहचा चांगला पद्धतीने वापर केला, तर भारताकडे जिंकण्याची संधी असेल. जरी इंग्लंड परिस्थितीमध्ये चांगली टीम असेल तरीसुद्धा भारत ही मालिका जिंकू शकतो. फक्त त्यांना नीट खेळणे आवश्यक आहे.
सौरव गांगुली यांनी नवा कर्णधार गिल विषयी देखील भाष्य केले आहे, कसोटी फलंदाज म्हणून त्याला अजून काम करण्याची गरज आहे. ही अशी परिस्थिती आहे जिथे त्याला धावा करण्याची गरज आहे, तो एक युवा कर्णधार आहे आणि तो बऱ्याच गोष्टी या मालिकेत शिकेल.






