ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता 40 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी आगामी विश्वचषकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
चॅपेल हे अगदी थोड्या कालावधीसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. जवळपास दोन वर्षाच्या या काळात भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झालेले पाहायला मिळाले. असे असले तरी चॅपेल हे अनेकदा भारतीय संघाचे कौतुक करताना दिसतात. विश्वचषकाबाबत आयोजित केल्या गेलेल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,
“भारतीय संघ यावेळी देखील विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे. घरच्या मैदानावर त्यांना पराभूत करणे सोपे नसते. भारतासह आशिया खंडातील देश नक्कीच विश्वचषकात लक्षात राहणारी कामगिरी करतील. मात्र, त्याचवेळी आयपीएलमुळे भारतात बराच वेळ घालवलेले ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे खेळाडू देखील विश्वचषकात खेळणार आहेत. त्यांना देखील या परिस्थितीचा फायदा होईल.”
याच मुलाखतीत बोलताना त्यांनी भारतीय संघ घरच्या परिस्थितीत कोणालाही घाबरत नाही व ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सर्व गोष्टी हाताळतात असे देखील म्हटले.
यावेळी भारत एकटाच विश्वचषकाचे आयोजन करत आहे. विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होऊन 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघ 2011 नंतर विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करेल. यजमान संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळला जाईल. तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होईल.
(Greig Chappell Said India Is Front Runner For ODI World Cup Win Australia And England Also Contender)
महत्वाच्या बातम्या-
‘जय शाहला पाहून कोण टाळ्या वाजवेल?’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने साधला पीसीबीवर निशाणा
रॉयल लंडन कपमधून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी शॉने दिला इतरांना दोष! इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत