---Advertisement---

गुवाहाटीची खेळपट्टी भारतासाठी अनलकी, आतापर्यंत पदरी पडलाय फक्त एकच विजय!

On: रविवार, जानेवारी 25, 2026 5:59 PM
---Advertisement---

पहिल्या दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी सुपरहिट ठरली आहे. रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या वादळी फलंदाजीने सामना पूर्णपणे एकतर्फी करून टाकला होता. भारतीय संघाने 209 धावांचे लक्ष्य अवघ्या 15.2 षटकांत पूर्ण केले होते.

मालिकेतील तिसरा टी20 सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा विक्रम फारसा समाधानकारक राहिलेला नाही. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाला या मैदानावर आजवर केवळ एकच विजय मिळवता आला आहे.

भारतीय संघाने बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाला फक्त एका सामन्यात यश मिळाले आहे, तर 2 सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तसेच, एक सामना अनिर्णित राहिला आहे.

2023 मध्ये भारतीय संघाने या मैदानावर आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, जिथे 222 धावा करूनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षभरात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसलेली सूर्याची सेना गुवाहाटीमधील आपला विक्रम सुधारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

पहिल्या आणि दुसऱ्या टी20 मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाची नजर आता गुवाहाटीत मालिका खिशात घालण्यावर असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या टी20 मध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून एकतर्फी धुव्वा उडवला होता. सूर्यकुमारने फॉर्मात परतत 37 चेंडूत 82 धावांची धडाकेबाज खेळी केली होती, तर ईशान किशननेही 32 चेंडूत 76 धावा ठोकल्या होत्या. मात्र, या सामन्यात संघ आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची नक्कीच अपेक्षा करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---