नुकतेच भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेत रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय संघातून वरिष्ठ खेळाडूंना बाहेर रस्ता देखील दाखवला जाऊ शकतो. त्याचवेळी सध्या न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पंड्या याने या वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ प्रत्येकी तीन सामन्यांची टी20 व वनडे मालिका खेळणार आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. या सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिकने सांगा बाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले. तो म्हणाला,
“इथे आम्ही एक युवा संघ घेऊन आलो आहोत. आमचे खेळाडू तरुण असले तरी, त्यांच्याकडे अनुभवाची कोणतीही कमतरता नाही. आयपीएलमध्ये ते सर्व दबावाचा सामना करत असताना, मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत खेळतात. आजचे युवा खेळाडू अति क्रिकेटला अजिबात घाबरत नाहीत.”
हार्दिक पुढे बोलताना म्हणाला,
“वेळेची जशा प्रकारची मागणी असेल तशा प्रकारे मी आणि इतर अनुभवी खेळाडू आपली जबाबदारी पार पाडू. आम्ही विश्वचषक मागे सोडलाय. आताचा काळ युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याचा व त्यांच्याकडून कामगिरी करून घेण्याचा आहे.”
पुढील टी20 विश्वचषकासाठी अद्याप दोन वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्या विश्वचषकात हार्दिक भारतीय संघाचा कर्णधार असावा असे अनेकांनी मत व्यक्त केलेय. बीसीसीआयमध्ये देखील तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारताच्या टी20 संघातून रोहित, राहुल, कार्तिक व अश्विन यांना बाहेर केले जाण्याची शक्यता आहे.
(Hardik Pandya Talk About Senior Players Place In T20 Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच
आंद्रे रसेलने हद्दच केली पार! थेट मॉलमध्येच झाला NUDE, फोटो पाहिला का?