भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका सध्या सुरू आहे. रविवारी (6 ऑगस्ट) उभय संघांतील दुसऱ्या सामन्याच्या निकाल पाहुण्या भारताच्या विरोधात गेला. वेस्ट इंडीजने या सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला असून भारताच्या पराभवासाठी फलंदाजांना कारणीभूत ठरवले जात आहे. कर्णधार हार्दिक पंड्या यानेही फलंदाजांच्या प्रदर्शनाबाबत नाराजी व्यक्त केली.
वेस्ट इंडीज आणि भारत (WI vs IND) यांच्यातील ही टी-20 मालिका पाच सामन्यांची आहे. त्यापैकी पहिल्या दोन्ही सामन्यात यजमान संघाकडून भारताला पराभव मिळाला आहे. वेस्ट इंडीज 2-0 अशा आघाडीवर असून भारतीय संघावर सर्व स्तरांमधून टिका केली जात आहे. फलंदाजी क्रमामध्ये भारतासाठी एकटा तिलक वर्मा (Tilak Varma) अर्धशतक करू शकला. संघाचे इतर सर्वजण 30 धावांचा टप्पा पार करू शकले नाहीत. याच पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने तिलक वर्माचे कौतुक केले, जो कारकिर्दीतील दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे.
या सामन्यात भारतासाठी पहिले षटक हार्दिक पंड्याने टाकले, ज्यामध्ये त्याने वेस्ट इंडीजच्या वरच्या फळीतील दोघांना बाद केले. संघाला अप्रतिम सुरुवात मिळाली असली तरी निकोलस पुरन (Nicholas Pooran) याच्या वादळी खेळीमुळे वेस्ट इंडीजचा विजय रोखता आला नाही. हार्दिक याविषयी म्हणाला, “खरं सांगायचं झालं, तर फलंदाजांचे प्रदर्शन समाधानकारक नव्हते. आम्ही अजून चांगली फलंदाजी करू शकत होतो. 160 पेक्षा जास्त किंवा 170 धावांचे आव्हान चांगले असते. निकोलस पूरन (Nicholas Pooran) याच्या फलंदाजीमुळे गोलंदाजांना चेंटू वळवताना अडचणी येत होत्या. त्याने सामना आपल्या हातात घेतला होता.”
हार्दिक भारतीय फलंदाजीविषयी म्हणाला, “सध्याच्या बॅटिंग कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला पहिल्या 7 फलंदाजांवर विश्वास दाखवावा लागेल. सोबतच गोलंदाज सामना जिंकवून देतील, अशी अपेक्षाही ठेवावी लागेल. आपल्याकडे संतुलित संघ आहे, पण फलंदाजांनी अधिक जबाबदारी घेतली पाहिजे. डावखूरा फलंदाज (तिलक वर्मा) चौथ्या क्रमांकावर येणे आपल्याला विविधता प्रदान करते. असे वाटलेच नाही की तो दुसरा सामना खेळत आहे.”
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, नाणेफेक जिंकून भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. निर्धारित 20 षटकांमध्ये भारताने 7 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ 15.5 षटकांमध्ये विजयी झाला. वेस्ट इंडीजसाठी निकोलस पूरन याने 40 चेंडूत 67 धावाची वादळी खेळी केली. तसेच भारतासाठी तिलकने 41 चेंडूत महत्वपूर्ण 51 धावा कुटल्या. (Hardik Pandya’s reaction after accepting defeat in the second consecutive T20 against West Indies)
महत्वाच्या बातम्या –
पूरन-अकिलचा टीम इंडियावर प्रहार! हार्दिक सेनेचा सलग दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव
BREAKING: अखेर पाकिस्तानच ठरलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्यास सरकारने दिली परवानगी