---Advertisement---

IND vs ENG: दुसऱ्या कसोटीत 200 धावा तरी होतील का? जाणून घ्या पिच रिपोर्ट

---Advertisement---

India vs England 2nd Test: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. आता दोन्ही संघातील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते मालिकेतील पहिला सामना त्यांनी गमावला आहे. त्यामुळे, एजबॅस्टनमध्ये खेळला जाणारा हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. (Edgbaston batting vs bowling)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना एजबॅस्टनमध्ये होणार आहे. या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व अधिक असते. सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसात ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरते. जरी हवामान ढगाळ असले तरी वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळते. पण या खेळपट्टीवर फलंदाज अधिक प्रभावी ठरतात. (Edgbaston pitch report)

एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर आतापर्यंत 60 कसोटी सामने खेळले गेले आहेत. दरम्यान एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 302 धावा राहिली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही फलंदाजी करणाऱ्या संघाचेच वर्चस्व राहिले आहे. दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्याही 302 धावाच आहे. मात्र, चौथ्या डावात खेळपट्टी कठीण होते. शेवटच्या डावातील सरासरी धावसंख्या 157 आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर 23 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. (Test match statistics Edgbaston)

पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून खराब क्षेत्ररक्षण पहायला मिळालं होतं. तसेच गोलंदाजीतही भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा पुनरागमन करतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---