यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत दिग्गज फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) निराशाजनक कामगिरी कायम राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात कोहली खास कामगिरी करु शकला नाही. या सामन्यात कोहलीनं फक्त 1 खणखणीत षटकार मारला आणि तंबूत परतला. कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये ज्याप्रकारे चमकदार कामगिरी केली होती, परंतू या विश्वचषक स्पर्धेत तो फ्लाॅप ठरला.
टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीनं (Virat Kohli) 9 चेंडूत 9 धावा केल्या. त्याला रिस टोपलीनं क्लीन बोल्ड केले. कोहलीनं आयपीएलमधून मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळताना 15 सामन्यात सर्वाधिक 741 धावा केल्या होत्या. परंतू या टी20 विश्वचषकात कोहलीची बॅट शांत राहिली आहे.
विराट कोहलीनं (Virat Kohli) यंदाच्या टी20 विश्वचषकात 7 सामन्यात फक्त 75 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या 37 धावा होती. यादरम्यान त्याची सरासरी 10 राहिली आहे. 2 सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला आहे. याआधी कोहलीनं शेवटच्या दोन सेमीफायनलमध्ये अर्धशतकं झळकावली होती. परंतू त्याच्यासाठी हा टी20 विश्वचषक निराशाजनक राहिला आहे.
कोहली 2012 पासून टी20 विश्वचषक खेळत आहे. कोहलीनं 2014 टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये 72 धावा ठोकल्या होत्या, तर 2016 टी20 विश्वचषकातील शेवटच्या 4 सामन्यांमध्ये कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्ध 89 धावांची नाबाद खेळी केली होती. 2022 च्या टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये कोहलीनं अर्धशतक झळकावलं होतं. इंग्लंडविरुद्ध आऊट झाल्यानंतर कोहली स्वतःवर रागावलेला दिसत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सेमीफायनल सामन्यात भारतानं हारला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
“जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा…” कपिल देवची भन्नाट प्रतिक्रिया
“खराब खेळपट्टीमुळे सामना हारलो…” अफगाणिस्तानच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकाची प्रतिक्रिया