भारतीय संघाकडून खेळण्यासाठी नेहमीच खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायाला मिळाली आहे. असे अनेक खेळाडू आहेत, जे चांगल्या फॉर्ममध्ये असून देखील त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळत नाही. असेच काहीसे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यासोबत झाले आहे. भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याकडून उमेशविषयीचा हा खुलासा केला गेला.
उमेश यादव (Umesh Yadav) नेहमीच भारताच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. मात्र संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि हार्दिक पंड्या चौथ्या गोलंदाजाच्या रूपात असल्यामुळे त्याला अनेकदा खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी संघा निवड झाली नाही म्हणून उमेश यादव (Umesh Yadav) याची प्रतिक्रिया काय असायची याविषयी माहिती दिली.
भरत अरुण म्हणाले, “असे अनेकदा झाले की, संघाचा भाग नसल्यामुळे उमेश यादव निराश असायचा. खासकरून चांगले प्रदर्शन केल्यानंतर त्याला संधी मिळाली नासेल, तेव्हा. पण मला स्पष्टीकरण द्यावे लागायचे कारण, तो नेहमी माझ्याकडे प्रश्न विचारत असे, ‘मला संघातून का बाहेर केल? मी काय चूक केली?’ हा निर्णय खूपच अवघड असायचा. कारण मागच्या सामन्यातील प्रदर्शन पाहूनच वेगवान गोलंदाजाची संघात निवड केली जात असते. शमी, बुमराह, इशांत आणि हार्दिक चौथ्या गोलंदाजाच्या रूपात संघात होते. त्यामुळे उमेश यादव चांगल्या प्रदर्शनानंतर देखील बाहेर असायचा. कधी- कधी उमेश यादव एवढा चिडायचा की, दिवसभर माझ्याशी बोलत नव्हता. पण नंतर संघाचा निर्णय समजून घेत असे. तो संघातील एक आदर्श सदस्य होता.”
दरम्यान, अनेकदा संघातून वगळला जाणारा उमेश सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या दोन कसोटीसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. पण इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली. उमेशने या सामन्यातील पहिल्याच डावात 12 धावा खर्च करून तीन विकेट्स नावावर केल्या. (If Umesh Yadav didn’t get a chance to play, he wouldn’t have talked all day, said Bharat Arun)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ ऑस्टेलियन गोलंदाज, बुमराहनंतर मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मोठा धक्का
बॅटवर धोनीचे नाव; डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच सामन्यात शेतकऱ्याच्या लेकीचे अर्धशतक, यूपी वॉरिअर्स विजयी