रविवारी (20 नोव्हेंबर) भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या वादली खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या पाच षटकांमध्ये धावांचा मोठा डोंगर उभा केला आणि सामना नावावर देखील केला. सूर्यकुमारने या सामन्यात एकूण 51 चेंडू खेळत नाबाद 111 धावा कुटल्या. शेवटच्या षटकांमध्ये सूर्यकुमारने जी आक्रमकता दाखवली, त्यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. त्याने स्वतः देखील शेवटच्या षटकांतील स्वतःच्या फलंदाजीविषयी प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघाने हा सामना तब्बल 65 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला. विजयानंतर भारत तीन सामन्यांच्या या टी-20 मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आला. भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत 191 धावा केल्या. यासाठी त्यांच्या एकूण 6 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड मात्र अवग्या 126 धावा करून सर्वबाद झाला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर शतक करण्यासाठी त्याला अवघ्या 49 चेंडू लागले. म्हणजेच शतकासाठी लागणाऱ्या शेवटच्या 50 धावा त्याने अवघ्या 17 चेंडूत केला. 15 व्या षटकापर्यंत भारताची धावसंख्या जास्त नव्हती आणि याच कारणास्तव त्याने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या मोठी बनवली.
‘त्यामुळे’ वादळी खेळी करावी लागली –
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “15 षटकांमध्ये आमची धावसंख्या 119 होती. चेंडू देखील ओला झाला होता. अशात गोलंदाजांना संधी देण्यासाठी आम्हाला 180 पर्यंत पोहोचावे लागणार होते. मी जेव्हा फलंदाजीला उतरलो, तेव्हा फक्त हाच विचार केला की, शेवटपर्यंत खेळायचे आहे, जे मी देले देखील. आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीलापासूनच विरोधी फलंदाजांवर दबाव बनवला होता.”
दरम्यान, उभय संघांतील याो टी-20 मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर भारत आघाडीवर आहे. आता मालिका बरोबरीवर सोडण्यासाठी न्यूझीलंड शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. उभय संघांतील हा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. (After the win, Surya himself explained the reason behind the stormy innings, know what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझी इच्छा आहे, पण आता फक्त एकच सामना राहिलाय’, वाचा काय म्हणाला कर्णधार हार्दिक
विराटपेक्षा सूर्याच भारी! विश्वास बसत नसेल, तर ‘ही’ आकडेवारी पाहाच