भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील यंदाचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. संपूर्ण जगाचे डोळे अंतिम सामन्यावर लागले आहेत. चालू चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाने या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चारही सामन्यांमध्ये विरोधी संघाला ऑलआउट केले आहे.
1. वरुण चक्रवर्ती
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विरोधी फलंदाजांना वरुण चक्रवर्तीचे चेंडू समजणे कठीण होत चालले आहे. कर्णधार रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आणि त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळवले आणि हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. यानंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वरुण सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध झाले. त्याने न्यूझीलंडचा फलंदाजीचा कणा मोडून काढला. या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचे फलंदाज त्याच्यासमोर टिकू शकले नाहीत. संघाला त्याच्या विरुद्ध धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. यानंतर, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही चांगली कामगिरी केली आणि एकूण दोन विकेट्स घेतल्या.
2. अक्षर पटेल
या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, अक्षर पटेलने मधल्या षटकांमध्ये खूप प्रभावी कामगिरी केली आहे. तो खूपच किफायतशीर देखील आहे. जेव्हा जेव्हा कर्णधार रोहित शर्माला विकेटची गरज होती, तेव्हा त्याने विकेट मिळवून दिली आहे. तो चांगल्या कोनातून गोलंदाजी करतो, फलंदाजांना जागा देत नाही. तो थेट स्टप्मवर गोलंदाजी करतो, ज्यामुळे त्याला लवकर विकेट मिळण्यास मदत होते. तो दुबईच्या खेळपट्टीवर चमत्कार करू शकतो. आतापर्यंत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 72 विकेट्स घेतल्या आहेत.
3. कुलदीप यादव
किकबझच्या रिपोर्टनुसार, भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना त्याच मैदानावर खेळवला जाईल ज्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानमधील सामना खेळवण्यात आला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. तेव्हा त्याने 40 धावा देऊन 3 बळी घेतले होते. तो विविधतेसह गोलंदाजी करतो आणि भरपूर गुगली टाकतो. त्याच्याकडे कोणत्याही फलंदाजीच्या आक्रमणाला बाद करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 179 विकेट्स घेतल्या आहेत.
4. रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो खेळपट्टी खूप लवकर समजतो आणि त्यानुसार गोलंदाजी करतो. गेल्या काही वर्षांपासून तो टीम इंडियाला यश मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. जडेजा आपला षटक लवकर पूर्ण करतो आणि विरोधी फलंदाजांना चेंडू समजून घेण्याची संधी देत नाही. जडेजाने आतापर्यंत भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 230 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
आयपीएलची ताकद! पाकिस्तानचा क्रिकेटपटू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेऊन स्पर्धेत सामील होणार
CT 2025: टीम इंडियाचा ‘ब्रह्मास्त्र’ फायनलमध्ये न्यूझीलंडसाठी घातक ठरणार?
रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, साधणार धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी!





