भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेचा शेवटचा सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिले तीन सामने भारताने जिंकून अजेय आघाडी मिळवली होती, तर चौथा सामना न्यूझीलंडने जिंकला. टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी खेळल्या जाणाऱ्या या मालिकेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांना आपली तयारी तपासण्याची अंतिम संधी मिळत आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक लक्ष संजू सॅमसनच्या कामगिरीवर असेल.
5व्या T20 सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन–
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी खेळल्या जाणाऱ्या मालिकेत भारतासाठी सर्वात मोठी आश्वासक गोष्ट म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवचा परत फॉर्ममध्ये येणे. सुरुवातीच्या तीन सामन्यांत त्याच्या कामगिरीने संघाला बळ दिले. त्याचबरोबर, दीर्घ काळानंतर संघात परत आलेल्या विकेटकीपर ईशान किशनने आपली आक्रमक फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीने उत्कृष्ट कामगिरी केली.
एक चिंतेचा विषय म्हणजे संजू सॅमसनचा फॉर्म. ओपनिंगमध्ये त्याने अपेक्षित कामगिरी अजून दाखवू शकलेली नाही, त्यामुळे मेगा इव्हेंटपूर्वी हा पाचवा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.






