भारतीय संघाने यंदाच्य टी20 विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेमीफायनल मध्ये इंग्लंड संघास 68 धावांनी धूळ चारत तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान विरुद्ध 9 विकेट्स राखून दोन्ही संघानी यंदाच्या विश्वचषकाचे आपलं फायनलच तिकीट पक्के केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे. हा सामना ओवल मधील बार्बाडोस येथे रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यतील सामन्या सारखेच या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. तथापि, एक चांगली गोष्ट आहे की अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे, परंतु जर राखीव दिवस पण वाहून गेला तर काय होईल? तर जाणून घेऊया सामन्याचे संपूर्ण गणित.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या हवामानाच्या अहवालानुसार, शनिवारी (29 जून) ढगाळ वातावरण असेल. एवढेच नाही तर वारा वाहणार असून तो दमट असणार आहे. पाऊस आणि वादळाचीही शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला 99% ढग आहे आणि वादळाची 47% शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरु होईल. त्याच वेळी, भारतात हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहता येईल.
पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिका फायनलच्या दिवशी म्हणजेच 29 जून रोजी सामना झाला नाही तर आयसीसीने त्यासाठी राखीव दिवस जाहीर केला आहे. म्हणजेच पाऊस पडल्यास सामना 30 जून रोजी होणार आहे. राखीव दिवशी म्हणजेच 30 जूनला पावसामुळे सामना खेळला गेला नाही, तर दोन्ही संघांना टी20 विश्वचषक 2024 चे संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिका संघ: रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नार्किया, तबरेझ शम्सी
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडिया फायनलसाठी बार्बाडोसला पोहोचली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका रंगणार अंतिम सामना
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात या स्टार खेळाडूला मिळालं ‘सर्वोत्तम क्षेत्ररक्षकचा’ पदक
रोहित शर्मासह राहुल द्रविडने केली विराट कोहलीची पाठराखण