भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सज्ज आहे. संघ या मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच भारतात दाखल झाला असून खेळाडू जोमाने सराव करत आहेत. आफ्रिकी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज कागिस रबाडा देखील या मालिकेसाठी उत्सुक दिसत आहे. तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी रबाडाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
कागिस रबाडा (Kagiso Rabada) या दौऱ्यात भारतीय संघासाठी मोठी बाधा ठरण्याची शक्यता आहे. रबाडा त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर भारतीय फलंदाजांचा घाम काढू शकतो. उभय संघातील टी-20 मालिका बुधवारी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी माध्यमांशी चर्चा करताना रबाडाने मोठे विधान केले. त्याच्या मेत टी-20 क्रिकेट म्हणजे फलंदाजांचा खेळ बनला आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना रबाडाने एक विधान करून सर्वांचेच लक्ष वेधले. त्याला वाटते, टी-20 फॉरमॅट म्हणजे पूर्णपणे फलंदाजांचा खेळ बनला आहे. वेगवान गोलंदाजाच्या मते या फॉरमॅटमध्ये दोन नवीन चेंडूंचा निर्णय आल्यापासून, असे झाले आहे. तो म्हणाला, “मी म्हणेल टी-20 फलंदाजांचा खेळ आह. दोन नवीन चेंडू, अशा गोष्टी आल्यापासून असे झाले आहे. हे सर्वकाही मोठी धावसंख्या बनण्यासाठी केले गेले आहे. एका गोलंदाजाच्या रूपात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी, यातून मार्ग शोधावा लागेल.”
आफ्रिकी संघ या दौऱ्यात टेंबा बावुमाच्या नेतृत्वात आला आहे. टी-20 फक्त फलंदाजांचा खेळ बनून राहिला आहे, असे रबाडा म्हणत असला, तरी त्यांच्या कर्णधाराचे विचार मात्र काही अंशी वेगळे दिसतात. बावुमाच्या मेत नवीन चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या बारतीय गोलंदाजांचे आव्हान सोपे नसेल. त्याने खासकरून बुमराहचे नाव घेत हे विधान केले. दरम्यान आफ्रिकी संघाचा हा चालू वर्षातील दुसरा भारत दौरा आहे. जून महिन्यात संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी आला होता. मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यामुळे मालिका 2-2 अशा बरोबरीने सुटला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नाणेफेक ठरणार निर्णायक! वियजासाठी भारताला घ्यावा लागणार ‘हा’ निर्णय
IND vs SA | दोन्ही संघात दिसणार ‘काटे की टक्कर’, पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन
मालिकेआधीच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने म्यान केली तलवार! पत्रकार परिषदेत म्हणाला…