भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघांमध्ये टी२० मालिका (IND vs SL T20 Series) सुरु आहे. शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशाला येथे पार पडलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७ विकेटने श्रीलंकेवर विजय मिळवला. या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाबाद अर्धशतकी खेळी खेळली. यावेळी भारताचा संजू सॅमसन याने (Sanju samson) त्याला मदत केली. सॅमसनने या सामन्यात २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार लगावत ३९ धावा केल्या. हा सामना सॅमसनसाठी खास होता, याबद्दल स्वत: सॅमसननेच खुलासा केला आहे.
संजू सॅमसन म्हणाला की, ‘खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती. मैदानाचे आऊटफिल्ड खुप वेगवान आहे. सीमारेषा पण खुपच लहान होती. जेव्हा आम्ही उत्तम खेळत होतो, तेव्हा आम्हाला वाटले की आम्ही सहज ध्येय गाठू शकतो. या खेळपट्टीवर षटकामागे १० धावा काढणे सोपी गोष्ट नव्हती.’
सॅमसन पुढे म्हणाला की, “श्रेयस अय्यरसोबतच्या भागीदारीमुळे मला लय परत मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला. कोण चांगले खेळत आहे आणि कोणाला वेळ हवा आहे, हो समजण्यासाठी आम्ही दोघेही पुरेसे क्रिकेट खेळलो. प्रत्येक चेंडू प्रमाणे मला पुढे जायचे होते, पण पहिल्या १०-१२ चेंडूत लय नव्हती.”
सॅमसन पुढे म्हणाला, “मला सामना खेळून खुप दिवस झाले. त्यामुळे मी थोडा जास्तीचा वेळ घेतला आणि चौकार मारल्यानंतर मला लय परत मिळाल्यासारखं वाटलं, त्यामुळे आनंद झाला. क्षेत्ररक्षण करताना आणि बाहेर बसतानाही खूप थंडी होती. मी ७ वर्षांपूर्वी पदार्पण केले आणि शेवटी संघाच्या यशात सकारात्मक योगदान देणे आणि देशासाठी खेळणे माझ्यासाठी खूप मोठी आहे.”
पहिल्या सामन्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर शनिवारी धरमशालाच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या साामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. भारताने ही टी२० मालिकाही आपल्या नावे केली आहे. श्रेयस अय्यरला दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. रविवारी (२७ फेब्रुवारी) या दोन संघांमध्ये तिसरा टी२० सामना धरमशाला येथे पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कॉफी घेणार का? हिमाचलच्या थंडीची सामन्यादरम्यान कर्णधार रोहित लुटतोय मजा, पाहा व्हिडिओ
भारत वि. श्रीलंका तिसऱ्या टी२०त पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी
तिसऱ्या टी२०साठी ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेईंग ११’, इशान किशनऐवजी मयंक अगरवालची होऊ शकते निवड