श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका सुरू होण्यापूर्वी मोहम्मद सिराजला दुखापत झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शनिवार, 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल, परंतु त्याआधी सिराजला दुखापत होणे ही टीम इंडियासाठी चांगली बातमी नाही. दुखापतीमुळे सिराज पहिल्या टी20 सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान वेगवान गोलंदाजाच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती आणि तो काही उपचार घेतानाही दिसला होता. मात्र, सिराजची दुखापत किती गंभीर आहे आणि तो टी20 मालिकेत खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. टीम इंडियाने टी20 मालिकेसाठी केवळ तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली असून त्यात मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद यांचा समावेश आहे.
अर्शदीप सिंगने 2024 च्या टी20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. तर खलील अहमदने आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करून पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. खलीलला यापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले होते. आता त्याला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत संधी मिळाली आहे.
उल्लेखनीय आहे की, सिराज शेवटचा 2024 टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसला होता. त्याने स्पर्धेत फक्त तीन सामने खेळला, ज्यात त्याने 1 बळी घेतला. आता तो पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नो, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
हेही वाचा-
राहुल द्रविडचा मुलगा समितची उत्कृष्ट कामगिरी, महाराजा ट्रॉफीसाठी या संघाचा बनला भाग
टाॅस होताच हृदय तुटणार! पहिल्या टी20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून हे 3 खेळाडू होणार बाहेर!
भारताची मान उंचावली! तिरंदाजांनी पदकाच्या दिशेने घेतली झेप..