सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर पासून खेळला जाणार आहे. मात्र पहिला सामना खेळल्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे, त्यामुळे उर्वरीत तीन सामन्यात भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. सचिन तेंडुलकरने एका कार्यक्रमात बोलताना अजिंक्यची खुप स्तुती केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ च्या एका कार्यक्रमात बोलताना विराटच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणार्या अजिंक्यबद्दल बोलताना त्याचे कौतुक केले.
तेंडुलकर म्हणाले, “तो संघातील वरीष्ठ खेळाडूपैकी एक आहे. रोहित, अजिंक्य, चेतेश्वर सारखे खेळाडू खुप कालावधी पासून संघात आहेत. हे वरीष्ठ आणि युवा खेळाडूंचे मिश्रण आहे. यासाठी उघड आहे की विराट जेव्हा त्याचे व्यक्तिगत काम करून परतेल तेव्हा संघाला तयार राहावे लागेल. कारण की सामान्यपणे एका खेळाडूंकडे पूर्ण मालिका खेळण्याची अपेक्षा केली जाते, मात्र त्याची हमी नसते.”
तेंडुलकर म्हणाले,” एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होवू शकतो. हे फक्त व्यक्तिगत कारणानी माघारी येण्यासाठी नाही. एखादा खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. हे नेहमी व्यक्तिगत कारणामुळे होवू शकत नाही. खेळाडूंना दुखापत ही होवू शकते आणि संघाला त्याच्याशिवाय खेळावे लागू शकते. उदाहरणार्थ भुवनेश्वर कुमार आयपीएल मधून बाहेर पडला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होत राहतात. जेव्हा कोहली नसेल तेव्हा मला विश्वास आहे की उर्वरित तीन सामन्यात संघ चांगली कामगिरी करेल. या बाबीमुळे विराट कोहली सुद्धा इतर भारतीयांप्रमाणे खुश होईल.”
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे म्हणणे आहे की, अजिंक्य रहाणे खुप समजदार खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन कसोटी सामन्यात आपल्या संतुलित आक्रमकतेने चांगले नेतृत्व करेल. अॅडलेड मधील पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी परतेल. तेंडुलकरने अजिंक्यला धर्मशाला येथील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताचे नेतृत्व करताना बघितले आहे आणि त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
तेंडुलकर म्हणाले, “हे थोडे वेगळे असणार आहे. अजिंक्यला मी ओळखतो. मला माहित आहे की तो समजदार आणि आणि संतुलित आहे. तो आक्रमक आहे पण त्याची आक्रमकता नियंत्रणात आहेत. मी त्याच्या सोबत जितका वेळ व्यतीत केला आहे, त्यानुसार मला माहित आहे तो खुप मेहनती आहे, कोणत्या गोष्टीला तो हलक्यात घेत नाही. जर तुम्ही मेहनत करता, प्रामाणिक आहात, तर परिणाम आपोआप मिळतात. मला विश्वास आहे की संघाची तयारी चांगली असेल. परिणामावर लक्ष केंद्रित न करता प्रक्रियेवर लक्ष द्यावे. परिणाम आपोआपच प्राप्त होतील.”
संबधित बातम्या:
– आम्ही त्यांचा सामना करण्यास उत्सुक, कर्णधार कोहलीकडून मुख्य प्रतिस्पर्ध्यांचा नावानिशी उल्लेख
– रहाणेच्या नेतृत्वाबद्दल कोहलीने केले भाष्य; म्हणाला
– या कारणाने विराटसह रहाणेवर देखील असेल आमचा फोकस , ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दिली प्रतिक्रिया