भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने दुसर्या सामन्यात 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. सोबतच 2-0 या फरकाने विजयी आघाडी घेत ही मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यात भारतीय संघाच्या या चार धुरंधरांनी मोलाचे योगदान देत मालिकेत विजय मिळवून दिला.
सिडनीत खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच हा दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता. त्याच्या जागी मॅथ्यू वेड याने संघाचे नेतृत्त्व केले. त्याने 25 चेंडूत 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.
त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथनेसुद्धा 46 धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलने 22 आणि हेन्रीक्सने 26 धावा करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 194 धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना 2 चेंडू आणि 6 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे आपण या लेखात भारतीय संघाला विक्रमी विजय मिळवून देणार्या 4 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
टी नटराजन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजनने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने याही सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना भारतीय संघाला विजय मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. भारतीय संघाला पहिल्या विकेटची गरज असताना 5वे षटक टाकण्यासाठी नटराजनला सांगितले.
नटराजनने आपल्या पहिल्याच षटकातील तिसर्या चेंडूवर डॉर्सी शॉर्टला श्रेयस अय्यरच्या हातून झेलबाद करून भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्याचबरोबर आपल्या शेवटच्या षटकात धोकादायक ठरल असलेल्या मोझेस हेन्रीक्सला बाद करत आपल्या कोट्यात दुसरी विकेट जमा केली. त्याने चार षटकात 20 धावा देत 2 विकेट घेतल्या. यामध्ये त्याच्या 24 चेंडूपैकी 23 चेंडूवर एक ही चौकार आला नव्हता. मात्र, 24 व्या चेंडूवर डॅनियल सॅम्सने चौकार ठोकला.
विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा या विक्रमी विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. राहुल बाद झाल्यानंतर संघाचा डाव सांभाळताना प्रति षटक 12 धावांची गरज होती, तेव्हा विराटने 24 चेंडूत 2 चौकार अणि 2 षटकार लगावत आक्रमक 40 धावांची खेळी केली. यामध्ये विराटने पहिल्या 12 चेंडूत फक्त 11 धावा केल्या होत्या. परंतु त्यानंतर 12 चेंडूत 21 धावा कुठल्या. आणि विजयात मोलाचे योगदान दिले.
शिखर धवन
ऑस्ट्रेलियाच्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आक्रमक सुरुवात करून देताना 52 धावांची अर्धशतकी खेळी. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील टी-20 मधील 11 वे अर्धशतक ठोकले. मागील काही सामन्यापासून शिखर धवनचा खराब फॉर्म सुरू होता. मात्र, योग्यवेळी त्याला सूर गवसला आणि भारतीय संघाला त्याचा फायदा झाला. या सामन्यात त्याने 36 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी करून भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली.
हार्दिक पंड्या
या मालिकेत हार्दिक पंड्याने सातत्याने धावा करताना विजयात सर्वात जास्त योगदान दिले. या विक्रमी विजयात योगदान देताना दुसर्या सामन्यात पंड्याने 22 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत आक्रमक नाबाद 42 धावांची खेळी केली. त्याने अतिशय योग्य वेळी संघाच्या मदतीला धावून येत सामना जिंकून दिली
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार