---Advertisement---

पंत, सुंदर आणि अक्षरमध्ये विक्रमी भागीदाऱ्या, तब्बल ४० वर्षांनंतर भारतीय संघाकडून झाला ‘हा’ मोठा पराक्रम

---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिमवर सुरु आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३६५ धावांवर संपुष्टात आला आहे. या डावादरम्यान भारताकडून दोन शतकी भागीदारी करण्यात आल्या. यामुळे एक खास विक्रम झाला आहे.

भारताच्या या डावात ७ व्या विकेटसाठी रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात ११३ धावांची भागीदारी झाली. तसेच त्यानंतर ८ व्या विकेटसाठी सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यात १०६ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे हा कसोटी इतिहासातील केवळ तिसरा असा सामना ठरला आहे, ज्यात एका डावात ७ व्या आणि ८ व्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली आहे.

याआधी सर्वात आधी असा पराक्रम २००८ साली सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सामन्यात झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ७ व्या विकेटसाठी हॉग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यात १७३ धांवाची भागीदारी झाली होती. तर ८ व्या विकेटसाठी सायमंड्स आणि ब्रेट लीमध्ये ११४ धावांची भागीदारी झाली होती.

तसेच त्यानंतर सिडनी येथेच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात २०११ साली झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात इयान बेल आणि मॅट प्रायर यांच्यात ७ व्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली होती. तसेच ८ व्या विकेटसाठी प्रायर आणि ब्रेसनन यांच्यात १०२ धावांची भागीदारी झाली होती.

त्यानंतर आता १० वर्षांनी भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीत असा पराक्रम तिसऱ्यांदा झाला आहे.

भारताच्या तळातील फलंदाजांच्या शतकी भागीदाऱ्या 

कसोटी सामन्यातील एका डावात ७ किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी २ शतकी भागीदारी करण्याचा पराक्रम भारतीय संघाकडून दोनवेळा झाला आहे. पहिल्यांदा दिल्ली येथे इंग्लंड विरुद्धच १९८१ साली ८ व्या विकेटसाठी रवी शास्त्री आणि सईद किरमानी यांच्यात १२८ धावांची तर शस्त्री आणि मदन लाल यांच्यात १०४ धावांची ९ व्या विकेटसाठी भागीदारी झाली होती.

त्यानंतर तब्बल ४० वर्षांनंतर भारतीय संघाला असा पराक्रम अहमदाबादला सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत करता आला आहे.

भारताचा पहिला डाव 

भारताचा पहिला डाव ११४.४ षटकात ३६५ धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून सर्वाधिक रिषभ पंतने १०१ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ सुंदरने नाबाद ९६ धावा केल्या. तसेच रोहित शर्माने ४९ आणि अक्षर पटेलने ४३ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने ३ आणि जॅक लीचने २ विकेट्स घेतल्या.

तसेच इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात आला असल्याने भारताकडे १६० धावांची आघाडी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

किती ते दुर्दैव! कोणीही साथीदार न उरल्याने सुंदर नव्वदीत नाबाद, ‘या’ भारतीयांवरही आलीय अशी वेळ

पन्नास वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?

आजच्याच दिवशी ५० वर्षांपुर्वी टीम इंडियाला मिळाला होता हिरा, ज्याने बदलला क्रिकेटचा चेहरामोहरा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---