प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी आगामी ३ महिने महत्वाचे ठरणार आहेत. पुढील ३ महिन्यात क्रिकेटमध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आशिया चषक आणि टी२० विश्वचषक या दोन स्पर्धा आयोजित करण्यात आलल्या आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये क्रिकेट जगतातील सर्वात हाय व्होजटेज मानली जाणारी भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत पाहायला मिळणार आहे.
नुकतीच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. यात २८ ऑगस्ट रोजी भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध खेळेल. शिवाय २०२१ साली आयोजित होणारा टी-२० विश्वचषक कोरोनाच्या काणामुळळे २०२२ साली ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेचे देखील वेळापत्रक काही दिवसांपूर्वी प्रसारित करण्यात आले होते. यात देखील भारत आणि पाकिस्तान हे संघ २३ ऑक्टोबर रोजी एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहेत.
The wait is finally over as the battle for Asian supremacy commences on 27th August with the all-important final on 11th September.
The 15th edition of the Asia Cup will serve as ideal preparation ahead of the ICC T20 World Cup. pic.twitter.com/QfTskWX6RD
— Jay Shah (@JayShah) August 2, 2022
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन संघात होणारा सामना नेहमीच रोमांचक आणि सर्वात लोकप्रिय सामना असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे दोन्ही देशांमधील वादांमुळे हे दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात. शिवाय देशांतर्गत वादांमुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाचे खेलाडू आणि देशांचे चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच अनेकदा हा सामना हरलल्यानंतर खेलाडूंवर टीकेचे झोळ उठल्याचे पाहायला मिळलत असते. असा परिस्थितीत केवळल ३ महिन्याच्या कालावधीत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान २ सामने पाहायला मिळलणे ही क्रिकेट चाहत्यांसाटी पर्वणी मानली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषक २०११मध्ये काय होता धोनीच्या विजयाचा फॉर्म्युला? माजी क्रिकेटरकडून महत्त्वपूर्ण उलगडा
‘कार्तिकला संधी मिळते, मग…?’, खेळाडूला संघातून बाहेर ठेवल्यामुळे माजी दिग्गजाने विचारला प्रश्न
बिग ब्रेकिंग! आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, कट्टर प्रतिस्पर्धींविरुद्ध भारत खेळणार पहिलीच लढत