येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन या दोन्ही संघांमध्ये सराव सामना पार पडला, जो अनिर्णीत राहिला आहे. परंतु या सामन्या दरम्यान भारतीय संघातील २ खेळाडू आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतग्रस्त झाले आहेत. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर शुबमन गिल देखील दुखापतग्रस्त असल्याने भारतात परतला आहे.
त्यामुळे हे तिघेही खेळाडू इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. परिणामी आगामी कसोटी मालिकेसाठी लवकरच ३ नव्या खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते.
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतरदुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. तसेच सराव सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे हे दोघेही कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. इतकेच नव्हे तर, रिषभ पंतला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे इतर खेळाडूंवरही कोरोनाचे संकट ओढवू शकते. म्हणून बीसीसीआय नवीन खेळाडूंना भरती करू शकते.
जेव्हा शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हा संघ व्यवस्थापकांनी त्याचा पर्यायी खेळाडू निवडण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी निवडकर्त्यांनी फेटाळून लावली होती. परंतु आता ३ खेळाडू बाहेर झाल्याने लवकरच निवड समितीची बैठक होऊ शकते.
पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, निवडकर्ते कुठल्या खेळाडूंना संधी देतील? कारण द्वितीय श्रेणीचा भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या मर्यादित षटकांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या संघातून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला बोलवले जाऊ शकते. तसेच यापूर्वी देखील या मागणीने जोर धरला होता. परंतु निवडकर्त्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. (Indian team could get new players as replacement for Washington sundar shubman gill and avesh Khan)
तसेच राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळवलेला अभिमन्यु ईश्वरनचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. यासह वृद्धीमान साहा देखील भारतीय संघाला जोडला जाऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
कोणाची फलंदाजी तर कोणाची गोलंदाजीत कमाल! सराव सामना अनिर्णीत राहूनही भारताला ‘असा’ झाला फायदा
भुवीने हार्दिकच्या फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती, तिसऱ्या वनडेत खेळणार की नाही केले स्पष्ट
इंग्लंड दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णित, ‘या’ खेळाडूंनी दाखवला दम