क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला विजय मिळवण्यासाठी संघातील खेळाडू जेवढे महत्वाचे असतात, तेवढाच महत्वाचा असतो एक चांगले कर्णधार. आयपीएल स्पर्धेमधील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी संघांवर नजर टाकली, तर त्यांच्याकडे एक दमदार कर्णधार देखील आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. एवढेच नाही, सीएसकेने धोनीच्या नेतृत्वात ४ वेळा आयपीएल ट्रॉफीही नावावर केली आहे.
आयपीएलमध्ये १०० सामने जिंकवून देणारा धोनी एकमात्र कर्णधार
एमएस धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०४ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी १२१ सामने जिंकवून दिले आहेत. आयपीएलमध्ये स्वतःच्या संघाला १०० सामने जिंकवून देणार एमएस धोनी (MS Dhoni) एकमात्र कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात संघाला ८२ आयपीएल सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला, तसेच एक सामना अनिर्णीत राहिला.
धोनीने २०४ सामन्यांपैकी १४ सामन्यांमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व केले. पुण्याचे नेतृत्व करताना त्याने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर ९ सामन्यात पराभव पत्करला. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने ४ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या, तसेच सर्वाधिक ९ वेळा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचला आहे.
रोहित शर्माच्या नावावर ७५ विजय
आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, तर सर्वाधिक सामने जिंकवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक येतो. रोहित आतापर्यंत १२९ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ७५ सामने संघाने जिंकले आहेत. बाकीच्या ५० सामन्यांमध्ये मात्र मुंबईला पराभव, तर ४ सामने अनिर्णीत राहिले. रोहितने सर्वप्रथम २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सची कमान सांभाळली होती आणि मुंबईचा संघ अजूनही त्याच्याच नेतृत्वात खेळत आहे.
तिसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर
भारतीय संघाचा माजी दिग्गज आणि कोलकाता नाइट रायडर्स नेतृत्व केलेले गौतम गंभीर (Gautam Gambhir) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएमध्ये गंभीरने दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व केले. त्याने दोन वेळा म्हणजेच २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले. त्याने एकूण १२९ आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली आणि त्यापैकी ७१ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान ५७ सामन्यांमध्ये गंभीरला पराभव पत्करावा लागला आणि एक सामना अनिर्णीत राहिला.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील रोमांच होणार कमी? सर्वात यशस्वी ५ गोलंदाजांपैकी हे ४ जणं स्पर्धेतून बाहेर
IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा
केकेआर संघासाठी बॅटिंग ऑर्डर बनली मोठी समस्या, श्रेयस अय्यर करणार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी?